AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain : साताऱ्यात भात लागवडीची लगबग, जुलैच्या अंतिम टप्प्यात साधले जाणार उद्दिष्ट..!

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने शेत शिवरात पाणी साचले आहे. भात लागवड ही शेतामध्ये पाणी साचले असतानाच केली जाते. त्यामुळे गुडघाभर पाण्यात शिरुन शेतकरी भात लागवड करीत आहे. अथक परिश्रम असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कायम आहे. शिवाय जुलैच्या अखेरपर्यंत खरिपातील पेरण्या उरकून घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की शेती कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

Heavy Rain : साताऱ्यात भात लागवडीची लगबग, जुलैच्या अंतिम टप्प्यात साधले जाणार उद्दिष्ट..!
समाधानकारक पावसामुळे भात लागवडीला वेग आला आहे. सातारा जिल्ह्यातील कण्हेर गाव परिसरात भात लागवडीची लगबग सुरु झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 17, 2022 | 5:04 PM
Share

सातारा : सलग 10 दिवस झालेल्या पावसाचा परिणाम हा (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणीवर झाला असला तरी याच पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरणही तयार झाले आहे. (Paddy Crop) भात लागवडीसाठी आवश्यक असलेला पाऊस जिल्ह्यात बरसला असून आता भात लागवडीची कामे जोमात सुरु आहेत. शिवाय पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. सध्या पावसाची उघडझाप होत असल्यामुळे भात लावणीला वेग आला आहे. तर इतर खरीप पिकांनाही जीवदान मिळाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Sowing) पेरणीचे गणित हुकले असले तरी आता उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे. गत महिन्यात पेरणी झालेल्या पिकांचा मशागत तर नव्याने भात लागवड ही कामे जोमात सुरु आहेत.

शेत शिवारात पाणी अन् शेतकऱ्यांचा उत्साह

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने शेत शिवरात पाणी साचले आहे. भात लागवड ही शेतामध्ये पाणी साचले असतानाच केली जाते. त्यामुळे गुडघाभर पाण्यात शिरुन शेतकरी भात लागवड करीत आहे. अथक परिश्रम असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कायम आहे. शिवाय जुलैच्या अखेरपर्यंत खरिपातील पेरण्या उरकून घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की शेती कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

भात लागवडीचे साधले जाणार उद्दिष्ट

पावासाचा परिणाम उडीद, मूग या पिकांवर झालेला आहे. आता यांचा पेरा झाला तरी उत्पादनात घट ही ठरलेलीच आहे. त्यामुळे शेतकरी आता केवळ सोयाबीनवर भर देत आहे. दुसरीकडे भात लागवड ही जुलैच्या अंतिम टप्प्यापर्यंत केली तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे पावसाने उघडीप देताच पुन्हा खरिपातील कामांना वेग आला आहे. लागवड अशीच सुरु राहिली तर सरासरीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

चारसूत्री पध्दतीने लागवड

भाताची लागवड करताना दोन्ही रोपांमधील अंतर 15*25 सेंटीमाटर ते 15*25 असे ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सरीमध्ये आलटूनपालटून असेच अंतर ठेवणे गरजेचे आहे. भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर