AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैज्ञानिक पध्दतीने खरबूजाची लागवड केल्यास भरघोस उत्पादन, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पोषक वातावरण

शेती व्यवसयात हंगामी फळपिकांचेही महत्व वाढत आहे. जसे की टरबूज आणि खरबूज. या फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर वाढ होत आहेच शिवाय खरबूजाचे तर विविध औषधी फायदेही आहेत. खरबूज हे अतिशय स्वादिष्ट आणि निरोगी फळ त्याच्या लागवडीचा कालावधी जवळ येत आहे. डिसेंबर ते मार्च या काळात लागवड केली जाते.

वैज्ञानिक पध्दतीने खरबूजाची लागवड केल्यास भरघोस उत्पादन, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पोषक वातावरण
खरबूज
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 03, 2021 | 7:08 PM
Share

मुंबई : शेती व्यवसयात हंगामी फळपिकांचेही महत्व वाढत आहे. जसे की टरबूज आणि खरबूज. या फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर वाढ होत आहेच शिवाय खरबूजाचे तर विविध औषधी फायदेही आहेत. (Melon Fruit Crop) खरबूज हे अतिशय स्वादिष्ट आणि निरोगी फळ त्याच्या लागवडीचा कालावधी जवळ येत आहे. डिसेंबर ते मार्च या काळात लागवड केली जाते. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये तर लागवड होतेच मात्र, (Maharashtra) महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये खरबूजाची लागवड होते हे विशेष आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात नदीलगतच्या बागायत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हे फळपिक घेतले जाते. खरबूजाचे फळ हे गोड असून त्यामध्ये काही जीवनसत्त्वे ए, बी, सी सारखी खनिजे असल्याने बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकरी त्याची चांगली लागवड करून चांगली कमाई करू शकतात.

जमीन आणि हवामान

मध्यम काळी आणि सिंचनाखालची शेतजमिन या पिकासाठी योग्य आहे. 5.5 ते 7 एम.एम मातीची पातळी या पिकांसाठी योग्य आहे.या पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान आणि मुबलक सूर्यप्रकाश आवश्यक आहे. 24 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस तापमान वेल वाढीसाठी पोषक आहे आहे. मात्र 18 अंश सेल्सिअस पेक्षा कमी किंवा 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान हे धोक्याचे आहे. त्याचा परिणाम वेलीच्या वाढीवर होतो.

खताचे प्रमाण

खरबूजाच्या लागवडीसाठी 90 किलो नायट्रोजन, 70 किलो फॉस्फरस आणि 60 किलो पोटाश हेक्टरी अशी मात्रा द्यावी. रासायनिक खतामध्ये निम्मी नायट्रोजन सामग्री आणि शेतात वाफे बनवताना फॉस्फरस आणि पोटॅशचे संपूर्ण प्रमाण दिले जाते. नायट्रोजनचे उर्वरित प्रमाण दोन समान भागांमध्ये विभागले गेले पाहिजे आणि उभ्या पिकातील मुळांजवळ पेरणी केल्यानंतर 20 आणि त्यानंतर 45 दिवसांनी हा डोस देणे गरजेचे आहे. 3 मिलीग्रॅम बोरॉन, कॅल्शियम आणि मॅलिब्डेनम हे प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर फळांची संख्या आणि एकूण उत्पन्नही वाढते.

खरबूज वाण आणि लागवडच

काशी मधु, हारा मधु, पंजाब सुनहरी आणि पंजाब हायब्रिड या वाणांची लागवड ही शेत उभे व आडवे नांगरून वाफे करुन लागवड करता येते. शेतात शेणखताची विस्कटणी केली तर उत्पादनात वाढ होते शिवाय पिकही जोमात वाढते. खरबूजांसाठी हेक्टरी 1.5 ते 2 किलो बियाणे पुरेसे आहे.

रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय

केवाडा – पानाच्या तळाशी पिवळे तपकिरी डाग दिसतात आणि नंतर पानांच्या देठांमध्ये आणि फांद्यांमध्ये पसरतात. याकरिता डिथेन झेड-78 ची फवारणी करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे फळांच्या माशांचे आणि पान किडीचेही नियंत्रण होते.

संबंधित बातम्या :

शेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय ? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या

सरकारच्या धोरणावरच ठरणार तुरीचे दर, शेतकऱ्यांना आशा हमीभाव केंद्राची

गळीत हंगामाला सुरवात मात्र, थकीत ‘एफआरपी’ रकमेचा मुद्दा कायम ; 43 कारखाने परवान्याच्या प्रतिक्षेत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली