AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पीएम किसान योजनेपासून वंचित, गावात तिरडीचे मडके पाहून…

PM KISAN YOJAYA : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शासकीय कर्मचाऱ्यांमुळे मोठी अडचण झाली आहे. जिवंत शेतकऱ्यांना मयत दाखवल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा त्यांना लाभ घेता येत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पीएम किसान योजनेपासून वंचित, गावात तिरडीचे मडके पाहून...
Buldhana newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2023 | 9:42 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM KISAN YOJAYA) अंतर्गत जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना मयत दाखवून शासनाच्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठी घोडचूक केली असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले आहेत. आता नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना (FARMER NEWS) पडला आहे. मागच्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. परंतु अद्याप त्यावर कसलाही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेला लाभ घेता येत नाही. मागच्या वर्षभरात काहीचं न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी (BULDHANA NEWS) गावात तिरडी मोर्चा काढला होता.

शासनाच्या विरोधात मोर्चा

मागच्या वर्षभरापासून शेलोडी येथील शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासन शासनाकडे चूक दुरुस्तीसाठी निवेदन सादर केले. परंतु त्याचा अद्याप कसलाही फायदा झालेला नाही. त्यामुळे शेलोडीतील शेतकऱ्यांची जशी अडचण झाली आहे. तसा इतरही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही. या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसचे नेते राम डहाके यांच्या नेतृत्वात शेलोडी येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

शेतकरी एवढ्यावर थांबले…

शेतकरी एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी शासनाच्या विरोधात तिरडी आंदोलन केलं. गावात तिरडीचे मडके पाहून यावेळी शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. समजा यानंतर सुध्दा शासनाने या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर आम्ही शेवटपर्यंत अशा पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी राम डहाके यांनी दिला.

पीएम किसान योजनेचा देशातील अनेक शेतकरी लाभ घेत आहेत.  वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा होतात. हे पैसे तीन टप्प्यात जमा होतात. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

Follow Us
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर.....
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर......
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....