AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पीएम किसान योजनेपासून वंचित, गावात तिरडीचे मडके पाहून…

PM KISAN YOJAYA : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शासकीय कर्मचाऱ्यांमुळे मोठी अडचण झाली आहे. जिवंत शेतकऱ्यांना मयत दाखवल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा त्यांना लाभ घेता येत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पीएम किसान योजनेपासून वंचित, गावात तिरडीचे मडके पाहून...
Buldhana newsImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 10, 2023 | 9:42 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM KISAN YOJAYA) अंतर्गत जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना मयत दाखवून शासनाच्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठी घोडचूक केली असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले आहेत. आता नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना (FARMER NEWS) पडला आहे. मागच्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. परंतु अद्याप त्यावर कसलाही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेला लाभ घेता येत नाही. मागच्या वर्षभरात काहीचं न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी (BULDHANA NEWS) गावात तिरडी मोर्चा काढला होता.

शासनाच्या विरोधात मोर्चा

मागच्या वर्षभरापासून शेलोडी येथील शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासन शासनाकडे चूक दुरुस्तीसाठी निवेदन सादर केले. परंतु त्याचा अद्याप कसलाही फायदा झालेला नाही. त्यामुळे शेलोडीतील शेतकऱ्यांची जशी अडचण झाली आहे. तसा इतरही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही. या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसचे नेते राम डहाके यांच्या नेतृत्वात शेलोडी येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

शेतकरी एवढ्यावर थांबले…

शेतकरी एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी शासनाच्या विरोधात तिरडी आंदोलन केलं. गावात तिरडीचे मडके पाहून यावेळी शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. समजा यानंतर सुध्दा शासनाने या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर आम्ही शेवटपर्यंत अशा पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी राम डहाके यांनी दिला.

पीएम किसान योजनेचा देशातील अनेक शेतकरी लाभ घेत आहेत.  वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा होतात. हे पैसे तीन टप्प्यात जमा होतात. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान