AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: तर या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता… काय आहे अपडेट?

PM Kisan Yojana 24th Installment: पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. तर काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही. त्यांना पुढील 24 वा हप्ता सुद्धा मिळण्याची शक्यता कमी आहे. बोगस लाभार्थ्यांना चाप बसण्यासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. ही नोंदणी आवश्यक आहे.

PM Kisan Yojana: तर या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता... काय आहे अपडेट?
पीएम किसान योजना
| Updated on: Jul 04, 2026 | 10:00 AM
Share

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हुगळी (तारकेश्वर) येथे आयोजित किसान सन्मान समारोह संमेलनातून एक कळ दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण (DBT) पद्धतीने ही रक्कम जमा केली. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 31 कोटी 44 लाख रुपये जमा झाले. काही लाभार्थ्यांना मात्र हा हप्ता मिळाला नाही. त्यांच्या बँक खात्यात शेतकरी सन्मान निधीचा 24 वा हप्ताही जमा होण्याची शक्यता कमीच आहे. काय आहे त्यामागील कारण?

तीन हप्त्यात 6,000 रुपयांची मदत

पीएम किसान योजनेत दरवर्षी तीन हप्त्यात 6,000 रुपयांची मदत करण्यात येते. प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयांचा असतो. जवळपास 4 महिन्यांच्या अंतराने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नये यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना वारंवार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगते. ही अट जर पूर्ण केली नाही तर मग लाभार्थी शेतकऱ्याचा हप्ताही थांबतो. ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही.

24 वा हप्ता कधी मिळणार?

PM Kisan Yojana चे आतापर्यंत 23 हप्ते जमा करण्यात आले आहेत. 20 जून 2026 रोजी हा हप्ता जमा करण्यात आला. आता पुढील हप्ता हा 4 महिन्यांनी हा हप्ता देण्यात येईल. या अंदाजाने ऑक्टोबर 2026 अथवा नोव्हेंबर 2026 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 24 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्याअगोदर शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सातबारा उतारा, आधार कार्ड लिंक अशी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. ही एक महत्त्वाची डिजिटल प्रणाली आहे. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही नोंदणी करणे आणि फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक

आधार कार्ड, तुमच्या मोबाईल क्रमाकांशी संलग्नित

जमिनीचा 7/12 उतारा, 8-अ

बँक पासबुक गरजेचे

Follow Us
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घड
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल