AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ दिवसाचीच रब्बी, अवकाळी पावसाचा परिणाम उगवणीवर, दुबार पेरणीची नामुष्की

यंदा सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. केवळ हंगामातच नाही तर आता अवकाळी पाऊसही शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे. कारण पेरणीला उशीर होत असल्याने मध्यंतरी पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली होती. मात्र, पेरणी होताच ऐन दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पेरलेलं उगवच नाही. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे.

आठ दिवसाचीच रब्बी, अवकाळी पावसाचा परिणाम उगवणीवर, दुबार पेरणीची नामुष्की
अवकाळी पावसामुले उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची नामुष्की ओढावली आहे
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 4:12 PM
Share

लातूर : यंदा सरासरीच्या तुलनेत  ( Heavy Rain) अधिकचा पाऊस झाला आहे. केवळ हंगामातच नाही तर आता अवकाळी पाऊसही शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरत आहे. कारण पेरणीला उशीर होत असल्याने मध्यंतरी पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली होती. मात्र, पेरणी होताच ऐन दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पेरलेलं उगवच नाही. त्यामुळे आता (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर ( Double sowing) दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. जमिनीतील ओल उडून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड केली मात्र, एका पावसाने सर्व मेहनत आणि पैसा वाया गेला असून आता मराठवाड्यात दुबार पेरणीला सुरवात झाली आहे.

ज्वारी हे रब्बीतील प्रमुख पिक आहे. यंदा अधिकच्या पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी हलक्या प्रकारची मशागत करुन पेरणीला सुरवात केली होती. शिवाय शेत जमिनीतील ओल उडाली तर पुन्हा शेत ओलवून पेरण्याची नामुष्की होती. त्यामुळे लगबग करुन ज्वारीचा पेरा केला. मात्र, पेरणीनंतर अवघ्या चार दिवसांमध्ये मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उगवण होणाऱ्या ज्वारीवर परिणाम झाला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर या ठिकाणी पेरणी झालेल्या क्षेत्रावर ज्वारीची उगवणच झालेली नाही.

अधिकच्या पावसामुळे जमिनी आवळून आल्या

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला होता. ऑक्टोंबर अखेरपर्यंत पाऊसच होता. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडणार हे अपेक्षित होते. शिवाय अचानक पावसाने उघडीप दिल्याने शेत जमिनी ह्या आवळून आल्या होत्या. त्यामुळे पेरलेले उगवते की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. यामध्येच अवकाळी पाऊस झाल्याने पेरणीला 10 दिवस झाले तरी उगवणच झाली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

दुष्काळात तेरावा

खरिपातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही नाजूक आहे. असे असताना रब्बी हंगामातील पेरणीला उशिर होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ट्रक्टरच्या सहायाने पेरणी उरकती घेतली मात्र, पेरलेले उगवलेच नाही. ट्रक्टरच्या सहायाने पेरणीसाठी एकरी 1500 रुपये शेतकऱ्याला मोजावे लागले होते. पैसा तर गेलाच शिवाय आता दुबार पेरणीचे कष्ट हे वेगळेच. त्यामुळे पावसाचा परिणाम केवळ खरिपातील पिकांवरच नाही तर रब्बीच्या पिकांवरही पाहवयास मिळत आहे.

बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणीच करु नये

दरवर्षी शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पेरणीला सुरवात करतात. पण यंदा बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी लागणार आहे. म्हणेज रासायनिक खताची मिसळण किंवा जैविक पध्दतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे.यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो. शिवाय यंदा अधिकच्या पावसामुळे जमिनीत पाणी आहे. त्यामुळे जमिनीत बुरशीचेही प्रमाण असणार आहे. यापासून पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्वाची आहे.

संबंधित बातम्या :

कडवट कारल्यात औषधी गुणधर्म, शेतकऱ्यांना भरघोस उत्पान्नाचीही संधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा फळबागायत शेतकऱ्यांना काय आहे सल्ला ?

…म्हणून सोयाबीनची घटत आहे आवक, लातूर बाजार समितीमध्ये केवळ 8 हजार क्विंटलची आवक

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.