AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar : हवामान विभागाचा अंदाज अन् कृषी विभागाचा सल्ला सर्वकाही व्यर्थ, दुबार पेरणीचे संकट मात्र कायम

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात तीन लाख हेक्टर खरीप पेरण्या होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर आतापर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या पावसावर पेरण्या आटोपल्या होत्या त्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले आहे.

Nandurbar : हवामान विभागाचा अंदाज अन् कृषी विभागाचा सल्ला सर्वकाही व्यर्थ, दुबार पेरणीचे संकट मात्र कायम
नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 07, 2022 | 3:31 PM
Share

नंदुरबार : राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी नंदुरबारकरांना मात्र अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे. (Meteorological Department) हवामान विभागाचा अंदाज राज्यासाठी आशादायी ठरला असला तरी (Nandurbar District) नंदुरबार जिल्हा मात्र अपवाद राहिला आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा तर कोरडा गेलाच आहे पण दुसऱ्या आठवड्यातही पावसाने दडी दिली आहे. जिल्ह्यात 77 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला नसल्याने केवळ 35 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे वाढीव उत्पादन तर सोडाच पण अपेक्षित (Kharif Sowing) पेरण्यादेखील होतील की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे हवामान विभागाचा अन् कृषी विभागाचा सल्ला हा जणूकाही नंदुरबारसाठी आहे का नाही असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली त्या क्षेत्रावरील पिकेही धोक्यात आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस जुलैमध्ये उघडीप

जिल्ह्यात 10 जूननंतर खरीप पेरणीला सुरवात होत असते. यंदा मात्र, 10 जुलै उजाडत आला तरी केवळ 35 टक्के क्षेत्रावरच खरीप पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत सरासरी एवढाही पेरा झालेला नाही. नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची 65% ची तुट आहे. तर जुलै महिन्याचा पहिला आठवडाही काही अंशी कोरडा गेला असेच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील कोणत्याही महसूल मंडळात 77 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्या नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कृषी विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांचे परिश्रम वाया जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अल्पशा पावसावर पेरणीचे धाडस

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात तीन लाख हेक्टर खरीप पेरण्या होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर आतापर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या पावसावर पेरण्या आटोपल्या होत्या त्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले आहे. अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

हवामान खात्याच्या वतीने जिल्ह्यात तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कृषी विभागाने योग्य ती ओल जमिनीत आल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले आहे. आता वेळेत आणि अपेक्षित पाऊस पडला तरच खरीप हंगामातील पेरण्या होतील असे चित्र आहे. आतापर्यंत हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. पण नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामच संकटात सापडलेला आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड