AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar : हवामान विभागाचा अंदाज अन् कृषी विभागाचा सल्ला सर्वकाही व्यर्थ, दुबार पेरणीचे संकट मात्र कायम

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात तीन लाख हेक्टर खरीप पेरण्या होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर आतापर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या पावसावर पेरण्या आटोपल्या होत्या त्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले आहे.

Nandurbar : हवामान विभागाचा अंदाज अन् कृषी विभागाचा सल्ला सर्वकाही व्यर्थ, दुबार पेरणीचे संकट मात्र कायम
नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत.
| Updated on: Jul 07, 2022 | 3:31 PM
Share

नंदुरबार : राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी नंदुरबारकरांना मात्र अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे. (Meteorological Department) हवामान विभागाचा अंदाज राज्यासाठी आशादायी ठरला असला तरी (Nandurbar District) नंदुरबार जिल्हा मात्र अपवाद राहिला आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा तर कोरडा गेलाच आहे पण दुसऱ्या आठवड्यातही पावसाने दडी दिली आहे. जिल्ह्यात 77 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला नसल्याने केवळ 35 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे वाढीव उत्पादन तर सोडाच पण अपेक्षित (Kharif Sowing) पेरण्यादेखील होतील की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे हवामान विभागाचा अन् कृषी विभागाचा सल्ला हा जणूकाही नंदुरबारसाठी आहे का नाही असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली त्या क्षेत्रावरील पिकेही धोक्यात आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस जुलैमध्ये उघडीप

जिल्ह्यात 10 जूननंतर खरीप पेरणीला सुरवात होत असते. यंदा मात्र, 10 जुलै उजाडत आला तरी केवळ 35 टक्के क्षेत्रावरच खरीप पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत सरासरी एवढाही पेरा झालेला नाही. नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची 65% ची तुट आहे. तर जुलै महिन्याचा पहिला आठवडाही काही अंशी कोरडा गेला असेच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील कोणत्याही महसूल मंडळात 77 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्या नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कृषी विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांचे परिश्रम वाया जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अल्पशा पावसावर पेरणीचे धाडस

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात तीन लाख हेक्टर खरीप पेरण्या होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर आतापर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी झालेल्या पावसावर पेरण्या आटोपल्या होत्या त्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले आहे. अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या रखडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

हवामान खात्याच्या वतीने जिल्ह्यात तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कृषी विभागाने योग्य ती ओल जमिनीत आल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले आहे. आता वेळेत आणि अपेक्षित पाऊस पडला तरच खरीप हंगामातील पेरण्या होतील असे चित्र आहे. आतापर्यंत हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. पण नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामच संकटात सापडलेला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.