AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांना दिलासा, कराड सत्र न्यायालयाकडून ऊसदरातील आंदोलन खटल्यातून निर्दोष मुक्तता

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची २०१३ मधील ऊसदर आंदोलनातील खटल्यातून कराड सत्र न्यायालयानं मुक्तता केली आहे. (Raju Shetti Sadabhau Khot)

राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांना दिलासा, कराड सत्र न्यायालयाकडून ऊसदरातील आंदोलन खटल्यातून निर्दोष मुक्तता
Raju Shetti Sadabhau Khot
| Updated on: Jan 15, 2021 | 2:33 PM
Share

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कराड येथील सत्र न्यायालयानं ऊसदर आंदोलनातील एका खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर कराड येथील २०१३ मधील ऊस दर आंदोलन प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. दोन्ही शेतकरी नेत्यांची खटल्यातून मुक्तता केली असली तरी कार्यकर्त्यांच्यावरील खटला सुरु ठेवण्यात येणार आहे. (Raju Shetti and Sadabhau Khot released by Karad Session Court from Sugarcane Prize Protest Case)

2013मधील प्रकरण

स्वाभिमनी शेतकरी संघटनेतर्फे ऊसदर प्रश्नी 2013 मध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको, टायर जाळणे अशा प्रकारचं आंदोलन केलं होते. 2013 मध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकत्रितपणे ऊसदर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करत होते. 2013 मधील ऊसदर आंदोलनातील 47 केसेसमधून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नेत्यांची निर्दोष मुक्तता कार्यकर्त्यांवरील खटले सुरु राहणार

कराड येथे 2013 साली झालेल्या ऊसदर आंदोलनाच्या 47 केसेसेमधून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांची इतर दोन खटल्यातून दोष मुक्तता झाली आहे. मात्र, यातील इतर आंदोलकांवरील खटला सुरूच राहणार आहे.

55 शेतकऱ्यांचा जीव जाऊनही सरकारला जाग नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर शेतकरी आंदोलनालवर शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. तापमान दीड डीग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. 55 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी केंद्र सरकारला दया आली नाही, अशी टीका केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्ठा चालवली होती, असंही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरु आहे. या आंदोलनात 55 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीसुद्धता या सरकारला जाग आली नाही, असा आरोप राजू शेट्टींनी केला. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला झापले. यामुळे न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधली नसल्याचं स्पष्ट झालं, असंही राजू शेट्टी म्हणाले. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनबाबात नाटक करत आहे. टाईमपास करत आहे, सुप्रीम कोर्टाने हे सगळं ओळखून केंद्र सरकारला चांगलेच झापले असल्याचे राजू शेट्टींना सांगितले.

संबंधित बातम्या :

मार्केट कमिट्या शेतकऱ्यांची मंदिरे नसून कत्तलखाने, सदाभाऊ खोतांचा आरोप 

चर्चेच्या फेऱ्या बंद करा, आता निर्णय घ्या, राजू शेट्टींनी केंद्राला सुनावले

(Raju Shetti and Sadabhau Khot released by Karad Session Court from Sugarcane Prize Protest Case)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.