शेतकऱ्यांनी साधला पाडव्याचा मुहूर्त, लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक अन् दरही…

आता बाजार समित्या बंद असताना कसले आलंय मुहूर्त असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेलच पण पाडव्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुरु होती. व्यापाऱ्यांनी दुकानाच्या पुजा केल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदीही. सलग सहा दिवस व्यवहार ठप्प असताना आज (शुक्रवारी) सोयाबानची विक्रमी आवक झाली होती. शिवाय दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांनी साधला पाडव्याचा मुहूर्त, लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक अन् दरही...
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 5:19 PM

लातूर : सोयाबीनच्या मुहूर्ताचा दर जरी कायम राहिलेला नसला तरी दराची फारशी चिंता न करता शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी दिवाळी पाडव्याचे मुहूर्त साधलेले आहे. आता बाजार समित्या बंद असताना कसले आलंय मुहूर्त असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेलच पण पाडव्या दिवशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुरु होती. व्यापाऱ्यांनी दुकानाच्या पुजा केल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदीही. सलग सहा दिवस व्यवहार ठप्प असताना आज (शुक्रवारी) सोयाबानची विक्रमी आवक झाली होती. शिवाय दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सोयाबीनच्या दरातील चढ-उतारामुळे बाजारात नेमकी आवक काय राहणार हे अद्यापही सांगता येत नाही. मध्यंतरी सोयाबीनचे दर घसरले तेव्हा केवळ 8 हजार पोत्यांची आवक होत होती. शुक्रवारी मात्र, 40 हजार पोत्यांची आवक झाली होती. त्यामुळे पाडव्या दिवशी व्यापाऱ्यांची दिवाळी ही गोड झाली आहे. बाजारपेठेत नवचैतन्य पाहवयास मिळाले.

सहा दिवसानंतर बाजार समिती सुरु

दिवाळीच्या अनुशंगाने रविवारपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. पाडव्याच्या दिवशी व्यवहार होतात हे शेतकऱ्यांना माहीत होते. त्यामुळेच शुक्रवारी पाडव्याच्या दिवशीही तब्बल 40 हजाप पोत्यांची आवक झाली होती. सलग सहा दिवस बाजार समिती बंद असल्याचाही हा परिणाम आहे. मात्र, सोयाबीनचे दर काहीही असोत शेतकरी विक्रीसाठी किती सजग झाला आहे हे शुक्रवारच्या आवक वरुन समोर आले आहे.

सोयाबीनला 5150 चा सरासरी दर

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. केंद्र सरकारच्या कडधान्य साठा मर्यादेच्या निर्णयाची मुदत ही संपलेली आहे. त्यामुळे कदाचित व्यापाऱ्यांनी साठवणूकीला सुरवात केलेली आहे. त्यामुळेच दर हे स्थिर आहेत अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. किमान दरात घसरण नाही हीच मोठी गोष्ट मानली जात आहे. त्यामुळे बाजारातील दराचा अंदाज नसतानाही लातूरसह उस्मानाबाद, बीड, अंबाजोगाई, सोलापूर, कर्नाटक येथून सोयाबीनची आवक झाली होती.

आता सोमवारी नियमित व्यवहार

शुक्रवारी पाडव्यानिमित्त येथील बाजार समिती ही सुरु होती. त्यामुळे सोयाबीनची विक्रमी आवक तर झालीच पण एकप्रकारे नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, उद्या (शनिवारी) बाजार समितीमधील व्यवहार हे भाऊबीजमुळे बंद राहणार आहेत. सोमवारपासून नियमित व्यवहार होतील असे बालाजी जाधव यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीननंतर आता खरिपातील ‘हे’ पीक धोक्यात, काय आहे उपाययोजना ?

थंडी सुरु होताच लाळ्या खुरकताचा धोका वाढला, जनावरांची योग्य देखभाल हाच उत्तम पर्याय

ज्वारीच्या पेऱ्यात घट, यंदाच्या रब्बीत गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.