AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उशिराचे शहाणपण : सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी Central Government चा पुढाकार, रशिया-युक्रेन युध्दामुळे वास्तव समोर

रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम शेती व्यवसयाशी निगडीतही झाला आहे. कारण याच देशातून भारताला रासायनिक खतांचा पुरवठा होतो. यंदा पुरवठ्यात विस्कळीतपणा होताच देशात उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. खताप्रमाणेच सुर्यफूल तेलाची अवस्था झाली आहे. खताप्रमाणेच रशिया आणि युक्रेनमधून सुर्यफूल तेलाची आयात ठप्प झाली आहे. आता सुर्यफूलाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनेच पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

उशिराचे शहाणपण : सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी Central Government चा पुढाकार, रशिया-युक्रेन युध्दामुळे वास्तव समोर
सुर्यफूल क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार राहणार आहे
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 02, 2022 | 2:55 PM
Share

पुणे : रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम शेती व्यवसयाशी निगडीतही झाला आहे. कारण याच देशातून भारताला (Chemical Fertilizer) रासायनिक खतांचा पुरवठा होतो. यंदा पुरवठ्यात विस्कळीतपणा होताच देशात (Production) उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. खताप्रमाणेच सुर्यफूल तेलाची अवस्था झाली आहे. खताप्रमाणेच रशिया आणि युक्रेनमधून  (Sunflower) सुर्यफूल तेलाची आयात ठप्प झाली आहे. आता सुर्यफूलाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनेच पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही वर्षात पुन्हा सुर्यफूलाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे. मात्र, आयातीवर परिणाम झाल्यावरच या गोष्टी देशातील कृषी विभागाच्या निदर्शणास आलेल्या आहेत.

नेमके काय असणार आहे धोरण?

यंदाच्या खरिपापासूनच सुर्यफूलाचे क्षेत्र वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्याअनुशंगाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्य कृषिमंत्र्यांच्या बैठका घेतल्या असून सुर्यफूलाचे क्षेत्र वाढण्याच्य़ा दृष्टीने प्रयत्न करण्याचे अवाहन केले आहे.एवढेच नाही तर सुर्यफूल लागवडीसाठी योजना राबवाव्यात शिवाय देशात कडधान्य, तेलबिया आणि राष्ट्रीय पाम मिशनप्रमाणे सुर्यफूल योजनाही राबवली जाणार आहे. त्याअनुशंगाने उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र हरियाना येथील राज्यांच्या अधिकाऱ्यांशी केंद्रीय कृषी मंत्री यांनी बैठक घेतली असून धोरण आखले आहे.

सुर्यफूल पीक नामशेष होण्याच्या मार्गावर

18 वर्षापूर्वी म्हणजेच 2004 साली रब्बी हंगामात सुर्यफूल हे 20 लाख 70 हजार हेक्टरावर घेतले जात होते. तर 12 लाख 50 हजार टनाचे उत्पन्न होत होते. मात्र, काळाच्या ओघात ज्या पिकातून अधिकचे उत्पन्न तेच पीक वावरामध्ये ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे सुर्यफूलाची जागा ही सोयाबीन, कापसाने घेतली होती. सन 2020-21 मध्ये केवळ 1 लाख 25 हजार हेक्टरावर सुर्यफूलाचा पेरा झाला होता. यंदा पावसामुळे काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, कमी उत्पादनामुळेच सुर्यफूल तेल आयात करण्याची नामुष्की ओढावल्याने आता उत्पादन वाढीवर भर दिला जाणार आहे. त्याच अनुशंगाने आता समिती स्थापन करण्यात आली असून यंदाच्या खरिपाापसून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

उत्पादनात घट, तेलाच्या दरात विक्रमी वाढ

सुर्यफूल पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम खाद्य तेलावरही झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे तेलाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या दरात वाढ होत आहे. मध्यंतरी तेलाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयातशुल्क घटवण्याचा निर्धार केला मात्र, त्याचाही उपयोग झाला नसल्याने 1 किलो तेलाच्या पिशवी ही आता 200 रुपयांर्यंत गेले आहे. त्यामुळे तेलाचे दर नियंत्रणात आणाय़चे असतील देशातील तेलबियांच्या क्षेत्रात वाढ करायची हाच पर्याय केंद्रासमोर राहिलेला आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : पालांवरचा पाडवा, ऊसाच्या फडात गुढी अन् ऊसतोड मजुरांचा उत्साह गगणाला भिडणारा

Beed : बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर काळी गुढी उभारून शासनाचा निषेध, मार्ग निघत नसल्याने शेतकरी आक्रमक

Watermelon : उन्हाळी हंगामातील हुकमी पीक, दोन वर्षाच्या नुकसानीनंतर धाडस केलेले शेतकरी यंदा मालामाल

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली