AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी, ढगाळ वातावरणानंतर आता उन्हाच्या झळा, मराठवाड्यात मात्र कोरडे वातावरण

निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची अनुभती गेल्या चार दिवसांमध्ये आलेली आहे. गतआठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावाड्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. मात्र, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तापमानात वाढ झाली आहे. विशेषत: मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.अणखी दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे.

अवकाळी, ढगाळ वातावरणानंतर आता उन्हाच्या झळा, मराठवाड्यात मात्र कोरडे वातावरण
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: Tv9
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 14, 2022 | 5:07 PM
Share

मुंबई : निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची अनुभती गेल्या चार दिवसांमध्ये आलेली आहे. गतआठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह कोकणात  (Untimely Rain)अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावाड्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. मात्र, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (Temperature) तापमानात वाढ झाली आहे. विशेषत: मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.अणखी दोन दिवस ही (Heat wave) उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. तर दुसरीकडे राज्यातून अवकाळी गायब झाली असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात हवामान हे कोरडे राहणार आहे. मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच उन्हामध्ये वाढ झाली होती. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच पारा 36 अंशापर्यंत गेला तर एप्रिल-मे मध्ये काय होणार हा प्रश्न आता मुंबईकरांच्या समोर आहे.

मुंबईत 35 ते 40 तापमानाची नोंद

गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ होत आहे मात्र, सोमवारी याची तीव्रता अधिकच वाढली होती. मुंबई महानगर परिसरात 36 ते 40 अंश सेल्सिअसची एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. सकाळी 11 ते दुपारी 4 च्या दरम्यान उन्हाच्या झळा अधिक तीव्र असणार आहेत. पुढील दोन दिवस ही लाट कायम राहणार आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कोरडे वातावरण

गेले तीन दिवस ढगाळ वातावरण आणि काही भागात अवकाळीचा कहर झाल्यानंतर सोमवारपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रत कोरडे हवामान आहे. तर इतरत्र भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.गोवा आणि कोकणच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत तापमानात वाढ झाली आहे. पण आता दिवसेंदिवस तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पीक काढणी कामाला येणार वेग

मध्यंतरीच्या अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पीक काढणीला ब्रेक लागला होता. पण आता वातावरण निवळले आहे. त्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा काढणी कामे ही वेगात होणार आहे. अवकाळी पावसाने मराठवाड्याला बगल दिल्याने संभाव्य नुकसान हे टळलेले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीन-हरभऱ्याचे दर स्थिर, आवक मात्र तेजीत, आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे चित्र?

रोहयो : रोजगाराची हमी पण अत्यंल्प मजुरी, वर्षभरानंतर झालेली वाढही चक्रावून टाकणारी!

Photo Gallery : शेतकऱ्यांच्या आंदोलनात पथनाट्य, आता तरी मिळेल का न्याय?

Follow Us
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती