Grape : द्राक्षे विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवरच शेतकऱ्यांचा भर, कशामुळे झाला हा बदल?

. बागायतदार हे द्राक्ष बाजारपेठेत नाही तर बेदाणा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या शेडवर पाठवताना दिसत आहेत. यंदा द्राक्ष घड पोसण्यासाठी पोषक वातावरण नव्हते. त्याचा परिणाम आता काढणी झाल्यावर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. दरम्यानच्या काळात घडकूज, मणीगळ एवढेच नाही डाऊनी सारख्या रोगामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकासान झाले होते.

Grape : द्राक्षे विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवरच शेतकऱ्यांचा भर, कशामुळे झाला हा बदल?
बेदाणा संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 7:30 AM

सांगली : गेल्या वर्षभरातील वातावरण बदलाचा परिणाम काय होतो हे आता (Vineyards) द्राक्ष बागायतदाराची अवस्था पाहून लक्षात येत आहे. दरवर्षी द्राक्षांची काढणी झाली की लगबग असते ती माल बाजारपेठेत पोहचवण्याची मात्र, यंदाची स्थिती ही वेगळीच आहे. बागायतदार हे द्राक्ष बाजारपेठेत नाही तर बेदाणा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या शेडवर पाठवताना दिसत आहेत. यंदा (Grape Pot) द्राक्ष घड पोसण्यासाठी पोषक वातावरण नव्हते. त्याचा परिणाम आता काढणी झाल्यावर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. दरम्यानच्या काळात घडकूज, मणीगळ एवढेच नाही डाऊनी सारख्या रोगामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकासान झाले होते. हे कमी म्हणून की काय (Increasing cold) वाढत्या थंडीमुळे द्राक्षांच्या मागणीत घटही झाली आहे. सर्वकाही नुकसानीचे होत असल्याने शेतकरी आता बाजारपेठेतील विक्रीपेक्षा बेदाणा तयार करण्यावरच भर देत आहे. त्यामुळे यंदा झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मुख्य बाजारपेठीची तमा न करता बेदाण्यातून का होईना झालेला खर्च काढण्याचे प्रयत्न करीत आहे.

बेदाणा निर्मीतीमध्येही अडचणी

वातावरणातील लहरीपणामुळे द्राक्षांचे तर नुकसान झालेच आहे पण आता बेदाणा बनवण्यासाठीही पोषक वातावरण नाही. बेदाणा निर्मीतीचा हंगाम जानेवारी महिन्यातच असतो. प्रतिकूल परस्थितीमध्ये ज्यांच्या बागा साधलेल्या आहेत ते शेतकरी आता विक्री बरोबर बेदाणा निर्मीतीवरही भर देत आहेत. बेदाणा निर्मीतीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पण गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण तर आहेच पण धुक्याचेही सावट आहे. त्यामुळे बेदाणा निर्मिती तर लांबणीवर पडणारच आहे पण या वातावरणाचा परिणाम बेदाण्यावर होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी द्राक्षांचे नुकसान झाले आहे आता बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल वातावरण नसल्याने द्राक्ष उत्पादकांबाबत सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे.

वाढलेल्या थंडीमुळे घडकूज

द्राक्ष बागा जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना एक ना अनेक शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहेत. शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करुन मध्यंतरीच्या गारठ्यात द्राक्ष बागांना ऊब मिळावी म्हणून बागेमध्ये शेकोट्या पेटवाव्या लागल्या होत्या. सर्व काही करुनही शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही कायमच आहे. द्राक्षातून नाही किमान बेदाण्यातून का होईना उत्पन्न पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण त्याकरिताही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सांगली जिल्ह्यात 400 ते 500 शेटवर बेदाण्याची निर्मीती

बाजारपेठेत विक्री न झालेल्या द्राक्षांचा बेदाणा केला जातो. याची एक स्वतंत्र यंत्रणा असते. जिल्ह्यात जवळपास 400 ते 500 शेडवर बेदाण्याची निर्मीती केली जाते. पण यंदा ना द्राक्षाचा दर्जा सुधारण्यासाठी पोषक वातावरण आहे ना बेदाणा निर्मितीसाठी. गेल्या वर्षभरापासून द्राक्ष बागांची जोपासना करुनही आता ना द्राक्षातून ना बेदाण्यातून उत्पन्न पदरी पडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

संबंधित बातम्या :

Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?

Sugarcane Sludge : क्षेत्र वाढले, गाळप रखडले आता अवघे दोन महिने उरले..!

Soybean Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांची भूमिका बदलली, आवक वाढली दराचे काय?

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.