AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने 4 रुपये 75 पैशाप्रमाणे दर निश्चित केले होते. त्यामुळे हा दर कमी असला तरी शाश्वत दरामुळे पिकाचे योग्य नियोजन केले जाईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, निर्णय तर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत.

Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?
पपईचे दर निश्चित होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 18, 2022 | 5:06 PM
Share

नंदुरबार : खानदेशात पपईचे क्षेत्र जास्त आहे. मात्र, दर निश्चित नसल्यामुळे (Papaya Area) पपई क्षेत्रात काळाच्या ओघात घट होत आहे. अधिकचे उत्पन्न होऊनही सातत्याने दराचा प्रश्न निर्माण होत असल्याने (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने 4 रुपये 75 पैशाप्रमाणे दर निश्चित केले होते. त्यामुळे हा दर कमी असला तरी शाश्वत दरामुळे पिकाचे योग्य नियोजन केले जाईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, निर्णय तर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत. बैठकीत ठरलेला दर प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये दिला जात नाही. (Buyer) खरेदीदार मनमानी करीत हे दर ठरवतात त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर नाही पण झालेला खर्चही शेतकऱ्यांना मिळत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने दरात घट होत आहे. त्यामुळे काढणीही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पपई क्षेत्रात घट होऊ लागली आहे. 4 रुपये 75 हा दर मुळातच कमी आहे. असे असतानाही त्याची अंमलबजावणीच होत नाही.

कशामुळे घेण्यात आला होता निर्णय?

हमीभाव केंद्रावर जसे शेतीमालाचे दर निश्चित केले जातात अगदी त्याप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बाजारपेठेत दर निश्चित करण्यात आले होते. पपईला सुरवातीपासूनच कमीचा दर आहे. असे असताना दराचा कायम तिढा असल्याने बाजार समिती प्रशासनाने शेतकरी आणि खरेदीदार यांना घेऊन बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये खरेदीदार यांच्या म्हणण्यानुसारच दर ठरविण्यात आला. मात्र, आवक जास्त झाली की, खरेदीदार हे मनमानी कारभार करीत पाडून मागणी करतात. त्यामुळे बैठक होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम आहेतच

सर्वाधिक क्षेत्र शहादा तालुक्यात

पपई हे खानदेशात अधिक क्षेत्रावर घेतली जाते. मात्र, सुरवातीपासूनच दराबाबतचे धोरण हे ठरलेले नाही. त्यामुळे खरेदीदार मागतील तोच दर ग्राह्य धरला जात होता. मात्र, दरावरुन कायम मतभेद होत असल्याने प्रति किलो 4 रुपये 75 पैसे असा दर ठरविण्यात आला होता. पण याची अंमलबजावणीच होत नाही. शहादा तालुक्यात 4 हजार हेक्टरावर पपई लागवड केली जाते. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या भागातही लागवड बऱ्यापैकी आहे. पपई दर ऑक्टोंबरमध्ये स्थिर होते. पण नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दरात सतत घट झाली. आता दर पाच रुपये प्रति किलो देखील नाहीत.

घटत्या दरामुळे बागांची मोडणी

पपईच्या दराचा प्रश्न कायम चर्चेत राहिलेला आहे. त्यामुळे हा मधला मार्ग काढला असताना त्याची अंमलबजावणीच झाली नाही. दरातील अस्थिरतेमुळे अनेकांनी बाग मोडणी पसंत करुन इतर पिकाचे उत्पादन घेणे पसंत केले आहे. सध्याच्या दरानुसार उत्पादनावर झालेला खर्चही निघणे मुश्किल असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. सध्या खानदेशात 15 टन पपईची आवक होत आहे. परराज्यातील व्यापारी हे येथील एजंटच्या मदतीने खरेदी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : क्षेत्र वाढले, गाळप रखडले आता अवघे दोन महिने उरले..!

Soybean Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांची भूमिका बदलली, आवक वाढली दराचे काय?

कृषी विभागाची भूमिका बजावत आहे ‘शिवार’ फाऊंडेशन, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम

Follow Us
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक