AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात

वाढत्या उन्हामुळे हंगामी पिकांच्या दरात वाढ होत आहे. आतापर्यंत कलिंगड, लिंबू याच्या दरात वाढ झाली आहे. पण नैसर्गिक गारवा असलेली काकडीही यंदा भाव खात आहे. त्यामुळे जे मुख्य पिकांमधून साध्य झालं नाही ते हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. काकडी ही आरोग्यासाठी चांगली असते शिवाय यामध्ये नैसर्गिक गारवा असतो त्यामुळे मागणीत वाढ होत आहे. सध्या 1 किलो काकडीसाठी 50 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.

Nanded : उन्हामुळे गावरान काकडीला विक्रमी दर, शेतकऱ्यांनीच घेतलं Market ताब्यात
यंदा शेतकऱ्यांनी हंगामी पिकातून अधिकचे उत्पन्न मिळवले आहे. पीक पध्दतीमध्ये बदल झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 08, 2022 | 10:17 AM
Share

नांदेड : वाढत्या उन्हामुळे (Seasonable Crop ) हंगामी पिकांच्या दरात वाढ होत आहे. आतापर्यंत कलिंगड, लिंबू याच्या दरात वाढ झाली आहे. पण नैसर्गिक गारवा असलेली (Cucumber crop) काकडीही यंदा भाव खात आहे. त्यामुळे जे मुख्य पिकांमधून साध्य झालं नाही ते हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. काकडी ही (Health) आरोग्यासाठी चांगली असते शिवाय यामध्ये नैसर्गिक गारवा असतो त्यामुळे मागणीत वाढ होत आहे. सध्या 1 किलो काकडीसाठी 50 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. यातच शेतकरी कुण्या व्यापाऱ्याला काकडी विकत नाही तर स्वत:च मार्केट जवळ करीत असून अधिकचा नफा घेत आहे. त्यामुळे पीक पध्दतीमधील बदलाबरोबर विक्रीमध्येही बदल करुन शेतकरी उत्पन्नात वाढ करीत आहे.नांदेड जिल्ह्यामध्ये हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर वाढत आहे.

यामुळे हंगामी पिकांच्या क्षेत्रात वाढ

कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न यासाठी हंगामी पिके हे चांगले माध्यम झाले आहे. पण दरवर्षी पाण्याची निश्चितता नसते. त्यामुळे शेतकरी हे पीक पध्दतीमध्ये बदल करण्यास धजावत नाहीत. पण यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने भर उन्हाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड, काकडी अशा हंगामी पिकांची लागवड केली होती. याचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. नांदेडमध्ये यंदा प्रथमच काकडी क्षेत्रात वाढ झाली आहे.

दोन महिन्यात पीक पदरात

हंगामी पिकांची जोपासणा व्यवस्थित झाल्यास यामधून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. काकडी, कलिंगड हे दोन महिन्यात उत्पन्न देणारी पिके आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी केलेला पीक पध्दतीमधील बदल यशस्वी ठरत आहे. दोन महिन्यात उत्पादन होणारे काकडीचे पीक आता काढणीला आलय, त्यातच नांदेडचे तापमान 42 अंशाच्या आसपास गेल्याने नैसर्गिक गारवा देणाऱ्या काकडीची मोठी मागणी वाढली आहे.

शेतकरीच विक्रेत्याच्या भूमिकेत

शेतकऱ्यांचे उत्पादन तर वाढत आहे पण योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्नात भर पडत नाही. उलट जे व्यापारी, मध्यस्ती आहेत ते अधिकचा फायदा घेतात. इतर शेतीमाल शेतकऱ्यांना स्वत:हून विक्री करता येत नसला तरी हंगामी पिकांची विक्री करता येते म्हणूनच काकडी, कलिंगड याची विक्री शेतकरीच करताना पाहवयास मिळत आहे. यामुळे कोणी मध्यस्ती राहत नाही शिवाय सर्व नफा शेतकऱ्यांच्या पदरीच. ग्राहकांना चांगला माल कमी किंमतीमध्ये मिळाल्याचे समाधान होते. त्यामुळे पीक पध्दतीमधील बदलाने शेतकऱ्यांना तारले आहे.

संबंधित बातम्या :

Sangola : वातावरणातील बदलाने डाळिंब बागा उध्वस्त, शेतकरी परिषदेत नेमका तोडगा काय?

Central Government : शेतकऱ्यांचे उत्पन्न करण्यासाठी सरकारचे काय आहे धोरण, कृषीमंत्र्यांनीच सांगितला Plan..!

‎SMAM Kisan Yojana : शेती उपकरणे खरेदी करताय? मग ‘या’ योजनेचा लाभ घ्याच..!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली