AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Central Government : शेतकऱ्यांचे उत्पन्न करण्यासाठी सरकारचे काय आहे धोरण, कृषीमंत्र्यांनीच सांगितला Plan..!

केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरीच हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून दोन्ही सरकार प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना मूलभुत सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.शेती व्यवसयात नवनविन प्रयोग राबवण्यासाठी केंद्राने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर चांगल्या बियाणांचा वापर करुन उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. 2016 पासून केंद्राने धोरणांमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्यासाठी गांभिर्याने काम सुरु केले आहे.

Central Government : शेतकऱ्यांचे उत्पन्न करण्यासाठी सरकारचे काय आहे धोरण, कृषीमंत्र्यांनीच सांगितला Plan..!
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 08, 2022 | 5:59 AM
Share

मुंबई : (Central Government) केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरीच हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून दोन्ही सरकार प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना (Basic facility) मूलभुत सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.शेती व्यवसयात नवनविन प्रयोग राबवण्यासाठी केंद्राने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर चांगल्या (Seeds) बियाणांचा वापर करुन उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. 2016 पासून केंद्राने धोरणांमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्यासाठी गांभिर्याने काम सुरु केले आहे. मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला असून गेल्या 6 वर्षात सरकारने काय प्रयत्न केले आहेत याची माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे. लोकसभेच्या प्रश्नोत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सातसुत्री कार्यक्रम सांगितला असून तो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

समितीची स्थापना आणि उद्दीष्ट

केंद्र सरकारने 2016 सालीच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण आखले होते. याकरिता आंतरमंत्रालयीन समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने 2018 सरकारला एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल हे स्पष्ट करण्यात आले आहे. या समितीनेच शेतीला मूल्याधारित उद्योग म्हणून मान्यता दिली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती, तंत्र, प्रशिक्षण, खते इत्यादी सुविधा पुरवण्याचे काम केले जात असल्याचे मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारचा हा आहे सातसूत्री कार्यक्रम

केंद्र सरकारचा प्लॅन आता कागदावर आलेला आहे. केंद्राने स्थापीत केलेल्या समितीने सातसुत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येणार असल्याचे सांगितले आहे. या उपाययोजना राबवून सरकार आपले उद्दीष्ट साध्य करणार आहे. 1.पीक उत्पादनात वाढ

2.पशूधनातून उत्पादनात वाढ

3.उत्पादन खर्च कमी आणि शेतकऱ्यांना संसाधनाचा वापर करुन त्यांचे काम सुखकर करुन देणे.

4.एका वर्षामध्ये एकच पीक न घेता यामध्ये वाढ करणे

5.अधिकचे उत्पन्न मिळेल असेच उत्पादन घेण्यावर भर देणे

6.शेतीमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना त्यांची चांगली किमंत मिळवून देण्याचा प्रयत्न

7.शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच इतर जोडव्यवसयातून उत्पन्न वाढविणे

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र संस्था

सरकारचे हे नियोजन केवळ हवेतच राहणार नाही. यासाठी केंद्राकडून आढावा घेतला जात आहे. याकरिता एका संस्थेची उभारणी करण्यात आली आहे. शिफारशी नुसार कोणत्या उपाययोजना राबवल्या याचा आढावा घेतला जात असल्याचेही केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.