AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : राजीनामा स्वीकारला, कोच बदलला, वर्ल्ड कप फायनलनंतर क्रिकेट बोर्डाचा निर्णय

Icc T20i World Cup 2026 Final : क्रिकेट वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कप विजेत्या संघाचा हेड कोच बदलण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या खेळाडूला जबाबदारी मिळाली.

Cricket : राजीनामा स्वीकारला, कोच बदलला, वर्ल्ड कप फायनलनंतर क्रिकेट बोर्डाचा निर्णय
Icc T20i World Cup 2026 Trophy.jpgImage Credit source: Icc X Account
| Updated on: Mar 09, 2026 | 10:21 PM
Share

टीम इंडियाने रविवारी 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचे खेळाडू या ऐतिहासिक विजयानंतर आपल्या घरी रवाना झाले आहेत. वर्ल्ड कप विजयाचा आनंद अजून सुरुच आहे. अशात क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाची 28 वर्षांची वर्ल्ड कप ट्रॉफीची दीर्घ प्रतिक्षा संपवणाऱ्या दिग्गजाला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. गेरी कर्स्टन यांची 2014 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.

कोचिंगचा तगडा आणि प्रदीर्घ अनुभव

कर्स्टन यांना कोचिंगचा तगडा आणि प्रदीर्घ असा अनुभव आहे. कर्स्टन यांनी भारताला 2011 साली त्यांच्या कोचिंगमध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तसेच कर्स्टन यांनी पाकिस्तानचीही हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच कर्स्टन नुकतंच आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत नामिबिया टीमसाठी सल्लागार म्हणून योगदान दिलं.

त्यानंतर आता कर्स्टन यांची श्रीलंकेच्या हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. कर्स्टन यांचा कोचिंगचा कालावधी हा 2 वर्षांचा असणार आहे. ते 15 एप्रिलपासून पदभार स्वीकारणार आहेत.

सनथ जयसूर्या याच्या जागी नियुक्ती

कर्स्टन यांची सनथ जयसूर्या यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. सहयजमान असलेल्या श्रीलंकेचं आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतून आव्हान संपुष्टात आल्याने जयसूर्या यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

श्रीलंकेचं आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतूनच आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानने श्रीलंकेवर 28 फेब्रुवारी रोजी सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात 5 धावांना मात केली होती. यासह श्रीलंकेचं स्पर्धेतून पॅकअप झालं. जयसूर्याने या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मुदतीआधीच राजीनामा

जयसूर्याने जुलै 2024 मध्ये अंतरिम हेड कोच म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर क्रिकेट बोर्डाने दिग्गज माजी फलंदाजांची ऑक्टोबर महिन्यात मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. जयसूर्याच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी हा जूनपर्यंत होता. मात्र जयसूर्याने त्याआधीच राजीनामा देऊन बाजूला व्हायचं ठरवलं. विशेष म्हणजे जयसूर्याने राजीनामा देणार याबाबत क्रिकेट बोर्डाला कोणतीही पूर्वकल्पना दिली  नव्हती. त्यामुळे क्रिकेट बोर्ड राजीनामा स्वीकारणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र कर्स्टन यांच्या नावाची घोषणा करताच जयसूर्याचा राजीनामा स्वीकार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, “इंग्लंड विरूद्धच्या मालिकेदरम्यान 2 महिन्यांआधीच मी या पदावर फार वेळ राहिन याची मला आशा नसल्याचं म्हटलं होतं. मी तेव्हाच हा निर्णय केला होता. त्यामुळे टी 20i वर्ल्ड कप मोहिमेचा शेवट अविस्मरणीय करण्याचा माझा प्रयत्न होता. मात्र मी तसं करण्यात अपयशी ठरलो”, असं म्हणत जयसूर्याने खंत व्यक्त केली होती.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...