AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात, सनथ जयसूर्याने लगेच मोठा निर्णय घेतला

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत श्रीलंकेची कामगिरी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत सुपर 8 फेरीत जागा मिळवली खरी.. पण तिन्ही सामने गमावले. त्याचे परिणाम आता संघ आणि व्यवस्थापनात दिसून येत आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात, सनथ जयसूर्याने लगेच मोठा निर्णय घेतला
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात, सनथ जयसूर्याने लगेच मोठा निर्णय घेतलाImage Credit source: PTI
| Updated on: Mar 01, 2026 | 5:31 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत श्रीलंकेला एकही सामना जिंकता आला नाही. शेवटच्या सामन्यातही पाकिस्तानने इंग्लंडला 5 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे या स्पर्धेतील श्रीलंकेचा शेवटही कटू झाला. श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यानेही या निराशाजनक कामगिरीनंतर मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याच निर्णय घेतला आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येताच त्याने याबाबत जाहीररित्या सांगितलं आहे. जयसूर्याचा श्रीलंकन संघासोबतचा करार जून 2026 पर्यंत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध 13 ते 25 मार्च दरम्यान होणाऱ्या व्हाईट बॉल मालिकेसाठी हे पद भूषवणार की नाही हे स्पष्ट केलं नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना 5 धावांनी गमावल्यानंतर सनथ जयसूर्या याने आपलं मन मोकळं केलं.

सनय जयसूर्या म्हणाला की, ‘मला वाटलं की मी ते पद दुसऱ्या कोणाला तरी द्यायला हवं. म्हणूनच मी दोन महिन्यांपूर्वी इंग्लंड मालिकेदरम्यान सांगितले होते की माझा मनात इथे राहण्याचा कोणताही विचार नाही. तो निर्णय घेतल्यानंतर मला वाटलं की विश्वचषक स्पर्धेनंतर मी येथून चांगल्या पद्धतीने जाऊ शकेन. मी जितका विचार केला होता तितके मी करू शकलो नाही. मला त्याबद्दल वाईट वाटते.’

“मी हे सांगितल्यानंतर माझी श्रीलंका क्रिकेटशी चर्चा झालेली नाही. त्यांना माहित नाही की मी असं काही सांगणार आहे. परंतु मी त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करणार आहे. मी त्यांना सांगितले आहे की जर त्यांना बदली व्यक्ती मिळू शकला तर नक्कीच पायउतार होईन.” जयसूर्या म्हणाला. सनथ जयसूर्याने जुलै 2024 मध्ये श्रीलंकेचं प्रशिक्षकपद हाती घेतलं हों. यानंतर घरच्या मैदानावर भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली. तसेच श्रीलंकेला इंग्लंडमध्ये या कारकिर्दीत कसोटी विजय मिळला.

‘मी माझ्या दीड वर्षात या संघाला पुढे नेले आहे. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रही झालो नव्हतो, पण मी संघाला एकदिवसीय सामन्यात चौथ्या क्रमांकावर नेले. मी कसोटी संघाला सहाव्या क्रमांकावर आणले. मी टी20 संघाला सहाव्या क्रमांकावर आणले. या सर्वांसाठी, मी संघाला एकूण 50 टक्के विजय दराने नेले. मी ते एकट्याने केले नाही; माझ्या सपोर्ट स्टाफने मला त्यासाठी खूप पाठिंबा दिला. मी सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मी त्यांना मदत करण्यास सांगितले. म्हणून, मला वाटते की मी जे केले त्याबद्दल मी आनंदी असू शकतो.’, असंही सनथ जयसूर्या पुढे म्हणाला.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.