AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवर अमेरिका इराण युद्धाचा परिणाम, उपांत्य फेरीपूर्वी आयसीसीने घेतला निर्णय

ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामना व्हायचे आहेत. असं असताना इस्राईल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध पेटलं आहे. त्याचा परिणाम आता इतर क्षेत्रावरही दिसून येत आहे. आता आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवर अमेरिका इराण युद्धाचा परिणाम, उपांत्य फेरीपूर्वी आयसीसीने घेतला निर्णय
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवर अमेरिका इराण युद्धाचा परिणाम, उपांत्य फेरीपूर्वी आयसीसीने घेतला निर्णयImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 01, 2026 | 4:14 PM
Share

इस्राईल-अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामनेई यांचा मृत्यू झाल्याने हे युद्ध आणखी पेटणार असं दिसत आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. युद्धाचा थेट परिणाम विमानसेवेवर झाला आहे. त्यामुळे अनेक विदेशी नागरिक विमानतळावरच अडकले आहेत. त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. या युद्धाचा परिणाम क्रीडाक्षेत्रावरही दिसून आला आहे. आबुधाबीत होणार इंग्लंड लायन्स आणि पाकिस्तान शाहीन यांच्यातील वनडे सामना रद्द झाला आहे. इतकंच काय तर भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही याचे परिणाम दिसून येत आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने एक निवेदन जाहीर केलं. तसेच या तणावपूर्ण स्थितीत दुसरा मार्ग काढण्यासाठी एक योजना आखण्यास सुरूवात केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने स्पष्ट केलं की, आखाती देशातील स्थितीचा स्पर्धेवर तसा काही थेट परिणाम होताना दिसत नाही. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही 7 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. 8 मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. आता अंतिम टप्प्याचे सामने सुरू आहेत. सुपर 8 फेरीचे सामने रविवारी संपतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी पकडून 3 सामने शिल्लक राहतील. श्रीलंका आणि पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून आऊट झाल्याने उर्वरित तिन्ही सामने भारतात होणार आहे. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल.

आयसीसीने प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट सांगितलं की, ‘आयसीसी ट्रॅव्हल अँड लॉजिस्टिक्स टीम आंतरराष्ट्रीय एअरलाईन्ससोबत सक्रियपणे चर्चा करत आहे. युरोप, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया केंद्रांच्या माध्यामातून पर्यायी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे.’ त्यामुळे विदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आयसीसीने पुढे स्पष्ट केलं की, ‘आयसीसीचे सुरक्षा सल्लागार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत आणि परिस्थिती बदलत असताना सल्ला देतील. एक समर्पित आयसीसी ट्रॅव्हल सपोर्ट डेस्क देखील सक्रिय करण्यात आला आहे.’

Follow Us
माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis | माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुप्रिया सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदार...
Video | अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदारांवर भडकलेच, पाहा व्हिडीओ
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार
महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित,
Maharashtra Devasthan | महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित, नेमकं प्रकरण काय?
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा थेट राजीनामा, पक्षांतर्गत वाद अचानक उफाळला
राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा
Mumbai MNS | राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा; नालेसफाईच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं!
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार......
Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार संसदेत बिल; थेट सांगूनच टाकलं!
श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन...
Team India T20 List  | श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन चेहऱ्यांना संधी.... सविस्तर माहिती
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकारी
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा पक्षाला रामराम...
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या आता...