CJP protest : जंतर मंतरवरील हजारो आंदोलकांच्या जेवणासाठी पैसे कुठून आणले? जुनैदचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, प्रकरणात ट्विस्ट
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान जुनैद नावाच्या व्यक्तीने हजारो आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनात पार्टीकडून करण्यात येत होती. त्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीमधील जंतर मंतरवर महिनाभर आंदोलन केलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चा काढाण्यात आला, या मोर्चात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली, या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला, हजारो विद्यार्थी आंदोलनासाठी जंतर -मंतरवर दाखल झाले. दरम्यान आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था केल्याने जुनैद चांगलाच चर्चेत आला होता. जुनैद याने एवढे पैसे कुठून आणले? त्याने एवढ्या मोठ्या संख्येनं जंतर -मंतरवर दाखल झालेल्या आंदोलकांच्या जेवणाची सोय कशी केली? असे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत होते. अखरे आता जुनैद समोर आला असून, त्याने सर्व प्रश्नाची उत्तरं दिली आहेत.
जुनैदने जंतर मंतरवर आलेल्या हजारो आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. तब्बल चार ते पाच दिवस तो जंतर मंतरवर तळ ठोकून होता. मात्र ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, त्यानंतर जंतर मंतरवर झालेल्या जल्लोषात तो कुठेच दिसला नव्हता, जुनैद कुठे गायब झाला असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत माहिती देताना त्याने मोठा खुलासा केला आहे. 24 जुलैच्या रात्री मला एका कुत्र्याने चावा घेतला होता, त्यामुळे मी उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. जेव्हा मी रुग्णालयातून वापस येत होतो, तेव्हा माला ताब्यात घेण्यात आलं, पोलिसांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. मला 17 ते 18 तास ताब्यात ठेवलं त्यानंतर मला उत्तराखंडमधील मसुरीला नेऊन सोडलं.
दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था कशी केली? याबाबत देखील जुनैदने मोठा खुलासा केला आहे. जुनैद हा पेशाने एक वकील आहे, तो म्हणाला मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. सहा जुलै रोजी मी या आंदोलनात सहभागी झाला होतो. वीस जुलै रोजी एक परीक्षा देऊन वापस येत असताना मी पुन्हा जंतर -मंतरवर गेलो तेव्हा पाहिलं की आंदोलकांना पाणी सुद्ध मिळत नाहीये, मग मी त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर जेवणाची व्यवस्था देखील केली या कामासाठी माझ्यासोबत लोक जोडत गेले, मी कोणाकडूनही फंड किंवा पैसे घेतले नाहीत, असा खुलासा जुनैद यांनी केला आहे.
