Latur Market: सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात, दर घटूनही शेतकऱ्यांवर ‘ही’ नामुष्की..!

सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना आपली भूमिका ही बदलावी लागली होती. सध्या खरीपातील साठवणूक केलेले सोयाबीन अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घटत आहेत. मात्र, घटते दर आणि भविष्यात उन्हाळी सोयाबीनची होणारी आवक यामुळे दर अणखीनच घटतील त्यामुळे अधिकचे काळ साठवणूक न करता आता सोयाबीन विक्री वर शेतकऱ्यांचा भर आहे.

Latur Market: सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात, दर घटूनही शेतकऱ्यांवर 'ही' नामुष्की..!
सोयाबीन संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 3:49 PM

लातूर : तीन महिन्यापूर्वी खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल झाले होते. मुहूर्ताच्या सोयाबीन तब्बल 11 हजार रुपये क्विंटलचा दर हा हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देण्यात आला होता. त्यानंतर सुरु झालेला चढ-उतार आता हंगामाच्या अंतिम टप्प्यातही सुरुच आहे. उत्पादनात झालेली घट आणि होत असलेली मागणी याचा ताळमेळ साधतच शेतकऱ्यांनी (Soybean Sale) सोयाबीनची विक्री केली होती. शेतकऱ्यांच्या या सावध भूमिकेमुळे मात्र, दर हे टिकून राहिले होते. त्यामुळे उत्पादनात झालेल्या घटीची कसर वाढीव दरामध्ये भरुन निघाली होती. परंतू हे दर कधीच टिकून राहिले नाहीत. सातत्याने होत असलेल्या (Soybean Rate) चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना आपली भूमिका ही बदलावी लागली होती. सध्या खरीपातील साठवणूक केलेले सोयाबीन अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घटत आहेत. मात्र, घटते दर आणि भविष्यात (Summer Season) उन्हाळी सोयाबीनची होणारी आवक यामुळे दर अणखीनच घटतील त्यामुळे अधिकचे काळ साठवणूक न करता आता सोयाबीन विक्री वर शेतकऱ्यांचा भर आहे. कारण 6 हजार दर असतानाही लातूर कृषी उत्पन्न् बाजार समितीमध्ये तब्बल 24 हजार पोत्यांची आवक झाली आहे.

शेतकऱ्याच्या मनात भीती कशाची?

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या भूमिकेवरच सोयाबीनचे दर अवलंबून होते. कारण उत्पादनात घट झाल्याने मागणी वाढणार याची कल्पना शेतकऱ्यांना होतीच. त्यामुळे दर वाढले की टप्प्याटप्प्याने विक्री आणि कमी झाले की साठवणूक हे गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतले होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून दर हे टिकून होते. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर हे घसरले आहेत. शिवाय जागतिक बाजारपेठेतली मागणीही घटलेली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनची साठवणूक करावी तर उन्हळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली तर ते दरही घसरतील अशी स्थिती आहे. त्यामुळे आहे त्या दरात सोयाबीनची विक्री यावरच शेतकऱ्यांचा भर आहे.

जानेवारीच्या सुरवातीला वाढले अन् अंतिम टप्प्यात घसरले

जानेवारी महिन्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झाली होती. 6 हजार प्रति क्विंटलवरील सोयाबीन हे 6 हजार 500 येऊन ठेपले होते. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना यामध्ये अणखीन वाढ व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच आता दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरात घट होत आहे. त्यामुळे पुन्हा सोयाबीन 6 हजारावर येऊन ठेपले आहे. शिवाय आता दर वाढीबाबत आशादायी चित्र नाही. त्यामुळे संपूर्णच सोयाबीनची साठवणूक न करता विक्री केली तरच फायद्याचे राहणार आहे. यंदाच्या हंगामात 4 हजार 500 ते 6 हजार 500 या दरम्यानच सोयाबीनचे दर राहिले होते.

संबंधित बातम्या :

फडातले वास्तव आयुक्तांसमोर : एफआरपी, ऊसाच्या प्रश्न बाजूलाच तोडणी अन् वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूटच

Agriculture Budget 2022 : झिरो बजेट शेती ते किसान ड्रोनच्या वापराला मंजुरी, शेती क्षेत्रासंबधी मोठे निर्णय एका क्लिकवर

ही कसली दुश्मनी? शॉर्टसर्किटमुळे नव्हे तर शेजाऱ्यानेच लावली ऊसाला काडी

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.