AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market: सोयाबीनचे दर अन् आवकही स्थिरच, शेतकऱ्यांचे लक्ष खरिपातील अंतिम पिकावर

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही सोयाबीन या मुख्य पिकावर असली तरी, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवकही स्थिरावलेली आहे. मध्यंतरी वाढत्या दरानुसार शेतकरी सोयाबीनची साठवणूक करायची विक्री हा निर्णय घेत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून 22 हजार पोत्यांची आवक आणि 6 हजार 300 चा दर हाच कायम आहे. सध्या बाजारपेठेत लक्ष वेधत आहे तुरीचे पीक.

Latur Market: सोयाबीनचे दर अन् आवकही स्थिरच, शेतकऱ्यांचे लक्ष खरिपातील अंतिम पिकावर
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली असून दर स्थिर आहेत.
| Updated on: Jan 19, 2022 | 2:00 PM
Share

लातूर : (Latur) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही (Soybean) सोयाबीन या मुख्य पिकावर असली तरी, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवकही स्थिरावलेली आहे. मध्यंतरी वाढत्या दरानुसार शेतकरी सोयाबीनची साठवणूक करायची विक्री हा निर्णय घेत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून 22 हजार पोत्यांची आवक आणि 6 हजार 300 चा दर हाच कायम आहे. सध्या बाजारपेठेत लक्ष वेधत आहे तुरीचे पीक. (Kharif Season) खरीप हंगामातील तूर हे अंतिम पीक आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून तुरीच्या दरात हळुहळु का होईना वाढ ही होत आहे. 1 जानेवारीपूर्वी राज्यात हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 5 हजार 800 पर्यंत होते. पण आता 6 हजार 500 पर्यंत पोहचलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता तुरीच्या दराकडे असून वाढत्या दरानुसारच तुरीचीही आवक ठरली जाणार आहे.

जुनं तेच सोनं असंच काहीस तुरीचं

सध्या बाजारपेठेत नवीन आणि जुन्या तुरीचीही आवक सुरु आहे. मात्र, जुन्या तुरीलाच अधिकचा दर आहे. कारण यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे कमी असते तर तूर ही वाळलेली असते. त्यामुळे व्यापारी हे जुन्या तुरीलाच पसंती देतात. तर दुसरीकडे हंगामाच्या अंतिम टप्प्यात नवीन तुरीला अवकाळी पावसाचा फटका हा बसलेला आहे. यामध्ये नुकसान तर झालेच पण त्यानंतरही ऊन नसल्यामुळे तूर पूर्णपणे वाळलेली नाही. परिणाम यामध्ये 10 टक्केपेक्षा अधिकची आर्द्रता आहे. त्यामुळे जुन्या तुरीला 6 हजार 400 तर नवीन तुरीला 6 हजार 200 पर्यंतचा दर मिळत आहे. आता कुठे हंगाम सुरु झाला आहे. बदलत्या दराप्रमाणे बाजारपेठेतील आवकचे आकडेही बदलणारच आहेत.

टप्प्याटप्प्याने नवीन तुरीची आवक

हंगामाच्या सुरवातीलाच आवक मोठ्या प्रमाणात झाली तर दर घसरतील यामुळे टप्प्याटप्प्याने तुरीची आवक बाजारपेठेत सुरु आहे. सोयाबीन, कापूस याबाबत शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली होती तीच पध्दत आता तुरीबाबतही राबवली जात आहे. सुरवातीला 6 हजाराच्या घरात दर असले तरी भविष्यात मागणीपेक्षा कमी पुरवठा झाला तर दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे तुरीची आवक सुरु होण्यापूर्वीच केंद्र सरकारने केलेली आवक याचा परिणाम दरावर होणार असल्याचे सांगितले जात होते पण प्रत्यक्षात आता हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणेच तुरीची विक्री महत्वाचे राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Untimely Rain : जिल्ह्यात अवकाळी अन् नुकसानीचा अहवाल एकाच तालुक्याचा, कृषी विभगाच्या रिपोर्टमध्ये दडलंय काय?

साखर कारखान्यांच्या कारभारात ‘गोडवा’ वाढवणारा राज्य बॅंकेचा निर्णय, कारभारात तत्परता अन् शेतकऱ्यांचेही हीत, वाचा सविस्तर

अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर ‘एक घाव दोन तुकडे’, सहसंचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमबजावणी गरजेची

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...