AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर कारखान्यांच्या कारभारात ‘गोडवा’ वाढवणारा राज्य बॅंकेचा निर्णय, कारभारात तत्परता अन् शेतकऱ्यांचेही हीत, वाचा सविस्तर

राज्यातील साखर कारखान्यांच्या कारभाराबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. असे असले तरी दुसऱ्या बाजूचा विचार करीत राज्य बॅंकेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे काही साखर कारखान्यांना दिलासा तर मिळणारच आहे पण शेतकऱ्यांचेही हीत जोपासले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या माल तारण कर्जावरील मार्जिन 15 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य बँकेने घेतला आहे.

साखर कारखान्यांच्या कारभारात 'गोडवा' वाढवणारा राज्य बॅंकेचा निर्णय, कारभारात तत्परता अन् शेतकऱ्यांचेही हीत, वाचा सविस्तर
यंदा ऊसाचे गाळप विक्रमी झाले असून सर्वाधिक साखरेचे उत्पादनही महाराष्ट्रातून होत आहे.
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 12:36 PM
Share

पुणे : राज्यातील (Sugar factories) साखर कारखान्यांच्या कारभाराबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. असे असले तरी दुसऱ्या बाजूचा विचार करीत (State Bank) राज्य बॅंकेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे काही साखर कारखान्यांना दिलासा तर मिळणारच आहे पण शेतकऱ्यांचेही हीत जोपासले जाणार आहे. साखर कारखान्यांच्या माल तारण कर्जावरील मार्जिन 15 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. त्यामुळे 5 टक्केची रक्कम साखर कारखान्यांना ही एफआरपी किंवा इतर बाबींसाठी वापरता येणार आहे. वाढते (sugarcane sludge) गाळप आणि यामुळे पेमेंट अदा करताना कारखान्यांना उद्भवणाऱ्या समस्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य बॅंकेच्या निर्णयाचा काय होणार फायदा?

राज्य बॅंकेने एकूण कर्जपुरवठ्यापैकी 40 टक्के कर्ज हे केवळ साखर कारखान्यांना वितरीत केले आहे. चालू हंगामातील उत्पादनाचा विचार केला तर यंदा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पेमेंट करताना साखर कारखान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ज्या कारखान्यांची एफआरपी ही 3 हजारापेक्षा अधिक आहे त्यांना पेमेंट करण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कारखान्यांची अडचण सोडवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. त्यामुले कारखानदारांना तर दिलासा मिळणारच आहे पण शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्यासही मदत होणार आहे.

या काखानदारांनाच होणार लाभ

राज्य बॅंकेकडून अधिकतर कर्ज हे कारखान्यांनीच घेतलेले आहे. ज्या साखर कारखान्यांचा सरासरी उतारा हा 10 टक्केपेक्षा अधिक आहे. शिवाय जे साखर कारखाने हे सुरवातीपासून कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत त्यांना प्राधान्य दिले जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुनच राज्य बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडील वसुलीही होणार आहे शिवाय शेतकऱ्यांना याचा अप्रत्यक्ष फायदाच होणार आहे.

कसा राहतो उत्पादित साठ्यावर दर?

कर्जाच्या बदल्यात राज्य बॅंक ही साखर कारखान्याच्या उत्पादित मालावर 15 टक्के मार्जिन लादत असते. त्यामुळे कारखान्याचे नुकसान नाही पण अधिकचे पैसे गुंतवूण राहतात. यातच यंदा साखर उत्पादनात वाढ झालेली आहे. त्यामुळे कारखान्यांना दिलासा मिळेल अन् त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल या दृष्टीकोनातून 15 टक्के वरील मार्जिन थेट 10 टक्यांवर केले आहे. यासंबंधीची माहिती बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर ‘एक घाव दोन तुकडे’, सहसंचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमबजावणी गरजेची

15 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर, काय आहेत कारणे? शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक

Grape Rate : दर निश्चित होऊनही द्राक्ष उत्पादकांची कोंडी, काय आहेत निर्यातदारांच्या मागण्या?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.