सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ, शेतकऱ्यांना खरचं फायदा झालाय?

गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे 11 महिन्यांमध्ये सोयाबीनचं तेल तब्बल 72 टक्के महागलं आहे. Soybean oil prices Increase

सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ, शेतकऱ्यांना खरचं फायदा झालाय?
महागाईची फोडणी तोंडाची चव घालवणार; खाद्यतेल महागले
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 5:12 PM

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणूी संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. काही राज्यांनी कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. आरबीआयच्या माहितीनुसार निर्बंध कायम राहिल्यास मागणी पुरवठा साखळीवर परिणाम होईल. यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. परिणामी महागाईच्या झळा बसू शकतात. भारतातील वायदेबाझार नॅशनल कमोडिटी अँड डेरीवेटिव्स एक्सचेंजनं देशात महागाई वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. (Soybean oil prices Increase 72 percent in Just 11 Months Food and beverages price will be expensive)

सोयाबीन तेल महागलं

गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे 11 महिन्यांमध्ये सोयाबीनचं तेल तब्बल 72 टक्के महागलं आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार सोयाबीन तेल आणखी महागू शकतं.  या सर्वाचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होऊ शकतो.

शेतकऱ्यांना फायदा मिळतोय?

सोयाबीनचा भाव मागील वर्षाच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एका क्विंटलला 4500 ते 7000 रुपये  या दरम्यान दर मिळाला आहे. काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यापेक्षा कमी किमतीला देखील सोयाबीन विकल्याचं दिसून येतं.

सोयाबीन तेलाचे दर का वाढले?

सोयाबीन तेलाचे दर वाढण्यामागे लोकांची अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवणं ही बाब आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्यानं लॉकडाऊनच्या भीतीनं लोक अतिरिक्त साठा करुन ठेवत आहेत. मागणी वाढल्यानं पुरवठ्यावर ताण येऊन किमती वाढत असल्याचं निरीक्षण काही तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय संशोधकांनी सोयाबीनचं नवं वाण तयार केलं आहे. या वाणाचा नाव MACS 1407 हे आहे. पुणे येथील संशोधन संस्थेने सोयाबीनच वाण तयार केलं आहे. या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल सोयाबीनंचं उत्पादन होऊ शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना एमएसीएस 1407 वाणाचं बियाणं पुढील हंगामापासून उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या:

कर्नाटकातील सुपरहिरो, पडीक शेतीमध्ये 700 झाडांची लागवड, पाण्यासाठी खोदल्या 5 गुहा

पुण्याच्या संस्थेकडून सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती, एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल उत्पादन मिळणार

(Soybean oil prices Increase 72 percent in Just 11 Months Food and beverages price will be expensive)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.