AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीन दरवाढीच्या आशेचा आता एकच किरण, शेतकऱ्यांनी पुन्हा घेतला साठवणूकीचा निर्णय

या हंगामात सातत्याने सोयाबीनच्या दरात चढ-उतार हे झाले आहेत. पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नुकसान टळले आहे. सध्या सोयाबीन सरासरी 6 हजारावर येऊन ठेपले आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना केवळ खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली तरच दर वधारतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सोयाबीन दरवाढीच्या आशेचा आता एकच किरण, शेतकऱ्यांनी पुन्हा घेतला साठवणूकीचा निर्णय
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 10:51 AM
Share

लातूर : जानेवारी महिन्याच्या सुरवातीला हळुहळु का होईना सोयाबीनच्या दरात वाढ होत होती. त्याचा परिणाम आवकवरही झाला होता. शेतकऱ्यांनी साठवणूकीतील सोयाबीन विक्रीसाठी काढले होते. शिवाय गेल्या तीन आठवड्यापासून 6 हजार 400 पर्यंत दरही स्थिरावले होते. मात्र, आता पुन्हा दरात घसरण सुरु झाली आहे. त्यामुळे (Sale of soybean) सोयाबीनची विक्री की साठवणूक हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या हंगामात सातत्याने सोयाबीनच्या दरात चढ-उतार हे झाले आहेत. पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नुकसान टळले आहे. सध्या सोयाबीन सरासरी 6 हजारावर येऊन ठेपले आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना केवळ (Edible Oil) खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली तरच दर वधारतील असा अंदाज (Trader) व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्याभरात रिफाईंड सोयाबीन तेलाचे दर सुधारले आहेत. खाद्यतेलाच्या दरात अशीच तेजी राहिली तर सोयाबीनलाही आधार मिळेल असा आशावाद व्यापारी व्यक्त करीत आहेत.

सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ

सध्या खाद्यतेलाचे दर हे तेजीत आहेत. त्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत पामतेलाचा तुटवडा भासत आहे. या अशा प्रतिकूल परस्थितीमध्येच सोयाबीन तेलाचा उठाव होत आहे. याचाच परिणाम सोयाबीन दरावर होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे. गतआठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवक ही घटलेली आहे. कारण सोयाबीनच्या दरात 200 रुपायांची घसरण झाल्याने पुन्हा शेतकरी हे साठवणूकीवरच भर देणार आहेत.

प्लांटधारकांकडूनही वाढणार मागणी

आतापर्यंत सोयाबीनच्या आवकवरच दर हे अवलंबून राहिलेले होते. अधिकचा दर असतानाही शेतकऱ्यांनी आवक ही प्रमाणातच ठेवल्याने त्याचा अधिकचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता. सध्या पुन्हा दरात घसरण झाली असली तरी रिफाईंड सोयाबीन तेलाच्या मागणीत वाढ झाल्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होणार आहे. शिवाय प्लांटधारकांकडूनही सोयाबीनची मागणी होत आहे. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये सोयाबीन तेलाच्या वाढत्या दराचा आधार सोयाबीनला मिळतो का हेच पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

निसर्गाचा लहरीपणा त्यात महावितरणची अवकृपा, सांगा शेती करायची कशी ?

Damage Orchards : द्राक्ष मण्यांना तडे, अंतिम टप्प्यातील केळीबागाही उध्वस्त, आता संरक्षणाशिवाय पर्याय नाही

…म्हणून जानेवारी महिन्यातच खोदल्या जातात अधिकतर विहीरी, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.