AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात

यंदाचा गळीत हंगाम मध्यावर आलेला आहे. मात्र, ऊसाचे वाढते क्षेत्र पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीसाठीचे वेगवेगळे प्रयोग यंदा कामी येणार आहेत. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात होणार असून यंदा निर्यातीसाठी सरकारी अनुदान नसतानाही देशातून 70 लाख टन साखर निर्यात होणार असल्याचे खुद्द साखर आयुक्त यांनी सांगितले आहे.

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात
साखर
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 3:49 PM
Share

पुणे : यंदाचा गळीत हंगाम मध्यावर आलेला आहे. मात्र, ऊसाचे वाढते क्षेत्र पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीसाठीचे वेगवेगळे प्रयोग यंदा कामी येणार आहेत. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात होणार असून यंदा निर्यातीसाठी सरकारी अनुदान नसतानाही देशातून 70 लाख टन साखर निर्यात होणार असल्याचे खुद्द साखर आयुक्त यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे यंदाच्या निर्यातीमध्ये वाढ होणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जागतिक साखर परिषदेत स्पष्ट केले आहे.

ऊसाचा गळीत हंगाम सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. या दरम्यानच्या काळात कच्च्या साखरेचे 30 लाख टनाचे करार झाले आहेत. अजूनही निम्म्यापेक्षा अधिकचे गाळप बाकी आहे. शिवाय काही साखर कारखाने तांत्रिक अडचणीमुळे उशिराने सुरु झाले होते. एकंदरीत साखरेचे उत्पादन वाढण्यासाठी पोषक वातावरण असून यंदा विक्रमी निर्यात होणार असल्याचे साखर आयुक्त यांनी लंडन येथील जागतिक साखर परिषदेत सांगितले आहे.

साखरेबरोबरच इथेनॅालची निर्मिती

जागतिक परिषदेमध्ये पिकांच्या व्यापाऱ्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सोयाबीन, गहू पाठोपाठ साखरेचाच व्यापार होत असल्याचे स्पष्ट झाले होते. काळाच्या ओघात आता इथेनॅाल निर्मितीवर भर दिला जात असल्याने यामधील धोरणात्मक बाबी या परिषदेत उलगडून सांगण्यात आल्या होत्या. भारतामध्येही इथेनॅाल निर्मीतीमध्ये एक मोठी ताकद उभी केली जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरही भारताची भूमिका ही महत्वाची राहणार आहे.

यामुळे साखर निर्यातीला अनुदान नाही

भारतामधील साखरेच्या धोरणावर पाकिस्तान, ब्राझील, थायलॅंड या देशांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले आक्षेप आजही कायम आहेत. निर्यातीला अनुदान देऊ नये अशी या देशांची मागणी आहे. मात्र, देशातील उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की अनुदानाशिवाय साखरेची निर्यात करण्याची क्षमता भारत देशाने ठेवलेली आहे. याचा प्रत्यय यंदा येणार आहे. अद्याप गाळप हंगाम मध्यावर आला असताना 30 लाख टन साखरेचे करार झाले आहेत.

इथेनॅालच्या निर्मितीमध्ये साखरेची भूमिका महत्वाची

इथेनॅालच्या निर्मितीमुळे जगाच्या वाटचालीत साखर आता महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुले साखर उत्पादक देशांना जागतिक पातळीवर महत्व राहणार आहे. नैसर्गिक वायूपासून मिळणाऱ्या सर्व बाबी ऊस आणि अन्नधान्यापासून मिळणार आहेत. त्यामुळे ऊसाचे महत्व भविष्यातही कायम राहणार आहे. ऊस उत्पादनात भारत हा आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे महागला ‘मालावी हापूस’चा गोडवा, रत्नगिरीतला हापूस कसा झाला ‘मालावी’

आनंदवार्ता : अखेर सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचा टप्पा

अवकाळीची अवकृपा फळबागांवर, वातावरणातील बदलामुळे शेतकरी मेटाकूटीला

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.