AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात

यंदाचा गळीत हंगाम मध्यावर आलेला आहे. मात्र, ऊसाचे वाढते क्षेत्र पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीसाठीचे वेगवेगळे प्रयोग यंदा कामी येणार आहेत. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात होणार असून यंदा निर्यातीसाठी सरकारी अनुदान नसतानाही देशातून 70 लाख टन साखर निर्यात होणार असल्याचे खुद्द साखर आयुक्त यांनी सांगितले आहे.

यंदा साखरेचा गोडवा अधिक वाढणार, सरकारी अनुदान नसतानाही होणार विक्रमी निर्यात
साखर
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 01, 2021 | 3:49 PM
Share

पुणे : यंदाचा गळीत हंगाम मध्यावर आलेला आहे. मात्र, ऊसाचे वाढते क्षेत्र पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीसाठीचे वेगवेगळे प्रयोग यंदा कामी येणार आहेत. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणात होणार असून यंदा निर्यातीसाठी सरकारी अनुदान नसतानाही देशातून 70 लाख टन साखर निर्यात होणार असल्याचे खुद्द साखर आयुक्त यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे यंदाच्या निर्यातीमध्ये वाढ होणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जागतिक साखर परिषदेत स्पष्ट केले आहे.

ऊसाचा गळीत हंगाम सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. या दरम्यानच्या काळात कच्च्या साखरेचे 30 लाख टनाचे करार झाले आहेत. अजूनही निम्म्यापेक्षा अधिकचे गाळप बाकी आहे. शिवाय काही साखर कारखाने तांत्रिक अडचणीमुळे उशिराने सुरु झाले होते. एकंदरीत साखरेचे उत्पादन वाढण्यासाठी पोषक वातावरण असून यंदा विक्रमी निर्यात होणार असल्याचे साखर आयुक्त यांनी लंडन येथील जागतिक साखर परिषदेत सांगितले आहे.

साखरेबरोबरच इथेनॅालची निर्मिती

जागतिक परिषदेमध्ये पिकांच्या व्यापाऱ्याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सोयाबीन, गहू पाठोपाठ साखरेचाच व्यापार होत असल्याचे स्पष्ट झाले होते. काळाच्या ओघात आता इथेनॅाल निर्मितीवर भर दिला जात असल्याने यामधील धोरणात्मक बाबी या परिषदेत उलगडून सांगण्यात आल्या होत्या. भारतामध्येही इथेनॅाल निर्मीतीमध्ये एक मोठी ताकद उभी केली जात आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरही भारताची भूमिका ही महत्वाची राहणार आहे.

यामुळे साखर निर्यातीला अनुदान नाही

भारतामधील साखरेच्या धोरणावर पाकिस्तान, ब्राझील, थायलॅंड या देशांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले आक्षेप आजही कायम आहेत. निर्यातीला अनुदान देऊ नये अशी या देशांची मागणी आहे. मात्र, देशातील उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की अनुदानाशिवाय साखरेची निर्यात करण्याची क्षमता भारत देशाने ठेवलेली आहे. याचा प्रत्यय यंदा येणार आहे. अद्याप गाळप हंगाम मध्यावर आला असताना 30 लाख टन साखरेचे करार झाले आहेत.

इथेनॅालच्या निर्मितीमध्ये साखरेची भूमिका महत्वाची

इथेनॅालच्या निर्मितीमुळे जगाच्या वाटचालीत साखर आता महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुले साखर उत्पादक देशांना जागतिक पातळीवर महत्व राहणार आहे. नैसर्गिक वायूपासून मिळणाऱ्या सर्व बाबी ऊस आणि अन्नधान्यापासून मिळणार आहेत. त्यामुळे ऊसाचे महत्व भविष्यातही कायम राहणार आहे. ऊस उत्पादनात भारत हा आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे महागला ‘मालावी हापूस’चा गोडवा, रत्नगिरीतला हापूस कसा झाला ‘मालावी’

आनंदवार्ता : अखेर सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचा टप्पा

अवकाळीची अवकृपा फळबागांवर, वातावरणातील बदलामुळे शेतकरी मेटाकूटीला

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.