AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खत उपलब्ध असूनही कृषी विक्रेत्यांची मनमानी, थेट पेरणीवर परिणाम!

गेल्या 8 दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: पालघर जिल्ह्यामध्ये अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. बाजारपेठेत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीनवर असून बियाणांबरोबर खत खरेदीसाठी शेतकरी आग्रही आहेत.

Kharif Season : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खत उपलब्ध असूनही कृषी विक्रेत्यांची मनमानी, थेट पेरणीवर परिणाम!
खत विक्रीसाठी डिस्पेच आयडी न मिळाल्याने पालघर जिल्ह्यात खत विक्रीला ब्रेक आहे.
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 3:57 PM
Share

पालघर : पावसाने दमदार हजेरी लावल्याने आता (Kharif Season) खरिपाची लगबग सुरु झाली आहे. आठ दिवसांमध्ये खरीप हंगामाबाबत चित्र बदलले आहे. त्यामुळे (Sowing) पेरणीचा टक्का झपाट्याने वाढणार असे तुम्हाला वाटत असेल पण स्थानिक पातळीवर भलत्याच अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पालघरातील अनेक (Agricultural Service Centre) कृषी सेवा केंद्राकडे केवळ आरसीएफ हा डिस्पेच आयडी नसल्याने खताचे वाटप रखडले आहे. आतापर्यंत खरिपाला नैसर्गिक संकट होते आथा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली आहे तर दुकानदारांकडून खत वाटपास विलंब होत आहे. त्यामुळे सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशीच अवस्था झाली आहे.

आरसीएफ म्हणजे नेमके काय?

कृषी सेवा केंद्रांना खताचा पुरवठा तर केला जातो पण खत कंपनीकडून ही संबंधित विक्रेत्यांना डिस्पेच आयडी मिळत नाही. खत कंपनीला खतावरील अनुदान मिळावे म्हणून हा कोड महत्वाचा असतो. तो कृषी सेवा केंद्र चालकांना सागितल्यावरच त्यांना खताची विक्री करता येते. मात्र, आरसीएफकडून हा आयडीच दिला गेला नसल्याने विक्रेत्यांकडे खत आहे पण ते विक्री करता येईना अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वकाही पोषक असताना आता तांत्रिक अडचणीमुळे खरीप पेरणीला ब्रेक लागला आहे.

शेतकऱ्यांची तोबा गर्दी

गेल्या 8 दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: पालघर जिल्ह्यामध्ये अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. बाजारपेठेत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीनवर असून बियाणांबरोबर खत खरेदीसाठी शेतकरी आग्रही आहेत. पण अनेक ठिकाणी तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात. पक्के बील घेतले तर फसवणूक झाल्यास पुन्हा त्याच्याकडून वसुलीसाठी सोपे होते.

फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत.
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.