AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खत उपलब्ध असूनही कृषी विक्रेत्यांची मनमानी, थेट पेरणीवर परिणाम!

गेल्या 8 दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: पालघर जिल्ह्यामध्ये अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. बाजारपेठेत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीनवर असून बियाणांबरोबर खत खरेदीसाठी शेतकरी आग्रही आहेत.

Kharif Season : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खत उपलब्ध असूनही कृषी विक्रेत्यांची मनमानी, थेट पेरणीवर परिणाम!
खत विक्रीसाठी डिस्पेच आयडी न मिळाल्याने पालघर जिल्ह्यात खत विक्रीला ब्रेक आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 08, 2022 | 3:57 PM
Share

पालघर : पावसाने दमदार हजेरी लावल्याने आता (Kharif Season) खरिपाची लगबग सुरु झाली आहे. आठ दिवसांमध्ये खरीप हंगामाबाबत चित्र बदलले आहे. त्यामुळे (Sowing) पेरणीचा टक्का झपाट्याने वाढणार असे तुम्हाला वाटत असेल पण स्थानिक पातळीवर भलत्याच अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पालघरातील अनेक (Agricultural Service Centre) कृषी सेवा केंद्राकडे केवळ आरसीएफ हा डिस्पेच आयडी नसल्याने खताचे वाटप रखडले आहे. आतापर्यंत खरिपाला नैसर्गिक संकट होते आथा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली आहे तर दुकानदारांकडून खत वाटपास विलंब होत आहे. त्यामुळे सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशीच अवस्था झाली आहे.

आरसीएफ म्हणजे नेमके काय?

कृषी सेवा केंद्रांना खताचा पुरवठा तर केला जातो पण खत कंपनीकडून ही संबंधित विक्रेत्यांना डिस्पेच आयडी मिळत नाही. खत कंपनीला खतावरील अनुदान मिळावे म्हणून हा कोड महत्वाचा असतो. तो कृषी सेवा केंद्र चालकांना सागितल्यावरच त्यांना खताची विक्री करता येते. मात्र, आरसीएफकडून हा आयडीच दिला गेला नसल्याने विक्रेत्यांकडे खत आहे पण ते विक्री करता येईना अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सर्वकाही पोषक असताना आता तांत्रिक अडचणीमुळे खरीप पेरणीला ब्रेक लागला आहे.

शेतकऱ्यांची तोबा गर्दी

गेल्या 8 दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: पालघर जिल्ह्यामध्ये अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. बाजारपेठेत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. शेतकऱ्यांचा भर हा सोयाबीनवर असून बियाणांबरोबर खत खरेदीसाठी शेतकरी आग्रही आहेत. पण अनेक ठिकाणी तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात. पक्के बील घेतले तर फसवणूक झाल्यास पुन्हा त्याच्याकडून वसुलीसाठी सोपे होते.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर