AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी आणि सरकारमधील आठवी बैठक निष्फळ, शेतकरी म्हणतात ‘लॉ वापसी’ नंतरच ‘घर वापसी’, सरकार म्हणतं…

Farmer Protest: केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील आठवी बैठक निष्फळ ठरली आहे. Farmer Unions and Center

शेतकरी आणि सरकारमधील आठवी बैठक निष्फळ, शेतकरी म्हणतात 'लॉ वापसी' नंतरच 'घर वापसी', सरकार म्हणतं...
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 08, 2021 | 6:10 PM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात (Agriculture Act) पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. तर, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे 41 प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेली चर्चा फिस्कटली आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये पुढील चर्चा 15 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बैठकीत सरकारपुढे ‘लॉ वापसी’ नंतरच घर वापसी अशी भूमिका मांडली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मात्र देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांचं स्वागत केलं असल्याचे सांगितले. (The eighth round between Farmer Unions and Center was fail next meet on 15 January )

कोणत्याही न्यायालयात जाणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका

सरकारसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी कायदे रद्द करावेत अशी मागणी केली. कायदे रद्द करण्याशिवाय आम्हाला दुसरे काही नको, अशी भूमिका मांडली. कायदे रद्द करण्यासाठी आम्ही कोणत्याही न्यायालयात जाणार नाही. आम्ही आमचा लढा सुरु ठेऊ, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. 26 जानेवारील आम्ही परेड करण्याचं नियोजन केले, असल्याचं ऑल इंडिया किसान सभेचे जनरल सेक्रेटरी हनान मोल्लाह यांनी सांगितले.

आठव्या फेरीतील चर्चेत केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी संघटनांचे 41 प्रतिनिधी सहभागी झाले होते. शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिले. शेतकऱ्यांनी सरकारनं लॉ वापसी केल्याशिवाय घर वापसी करणार नसल्याचे सांगितले. तर, केंद्र सरकारच्यावतीनं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देशातील विविध भागातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचं स्वागत केलं आहे. तर, शेतकऱ्यांनी देशहिताचा विचार करावा, अशी भूमिका तोमर यांनी घेतली.

विज्ञान भवनात शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी प्रतनिधी आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीपूर्वी नरेंद्र सिंह तोमर यांनी चर्चेतून तोडगा निघेल, असं सांगितलं होते.

पुढील बैठक 15 जानेवारीला

शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत 8 वेळा चर्चा झाली आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुढील बैठक 15 जानेवारील होण्याची शक्यता आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 44 वा दिवस आहे.

संबंधित बातम्या:

LIVE : तुम्ही तुमचं जेवण करा, आम्ही आमचं जेवून घेऊ; मंत्र्यांसोबत जेवण्यास शेतकऱ्यांचा नकार

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

(The eighth round of meeting between Farmer Unions and Center was fail next meet on 15 January )

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ