AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : बाजार समित्यांकडे कर्मचाऱ्यांच्या पगारीला पैसे नाहीत अन् म्हणे थेट शेतकऱ्यांमधून निवडणुक? अजित पवारांचा थेट सरकारला सवाल!

बाजार समितीच्या सभापतीच्या निवड प्रक्रियेत आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसयटीचे सदस्य यांचाच समावेश होता. मर्यादित मतदारच हे सभापती ठरवत होते. आता मात्र ज्याच्या नावे सातबारा उतारा आहे त्याला या निवडणुकीत सहभाग घेता येणार आहे. म्हणजे ज्या बाजार समितीची निवडणुक ही 1 हजार 800 मतदारांवर होणार होती ती आता 60 ते 70 हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुले यासाठी लागणारा खर्च कसा काढावा असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

Ajit Pawar : बाजार समित्यांकडे कर्मचाऱ्यांच्या पगारीला पैसे नाहीत अन् म्हणे थेट शेतकऱ्यांमधून निवडणुक? अजित पवारांचा थेट सरकारला सवाल!
विरोधी पक्षनेते अजित पवारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 4:53 PM
Share

बारामती : राज्यात (Eknath Shinde) शिंदे सरकारची स्थापना होताच स्थानिक पातळीवरील निवडणुका ह्या थेट जनतेमधून घेण्याचा निर्णय झाला तर (Market Committee Election) बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचाही सहभाग असणार असेही सांगण्यात आले आहे. मात्र, ही प्रक्रिया खूप किचकट असून बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारीचे वांदे आणि निवडणुकीचा खर्च कसा झेपणार असा सवाल (Ajit Pawar) अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील 60 ते 65 टक्के बाजार समित्या ह्या पगारीसुध्दा करुन शकत नाहीत तिथे कशा निवडणुका होणार? याबाबत आपण सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारच्या निर्णयाला कायम विरोध असून भविष्यात काय होणार हे पहावे लागणार आहे.

बाजार समितीची निवडणूकीचे चित्र बदलणार

बाजार समितीच्या सभापतीच्या निवड प्रक्रियेत आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसयटीचे सदस्य यांचाच समावेश होता. मर्यादित मतदारच हे सभापती ठरवत होते. आता मात्र ज्याच्या नावे सातबारा उतारा आहे त्याला या निवडणुकीत सहभाग घेता येणार आहे. म्हणजे ज्या बाजार समितीची निवडणुक ही 1 हजार 800 मतदारांवर होणार होती ती आता 60 ते 70 हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुले यासाठी लागणारा खर्च कसा काढावा असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. ही निवडणुक म्हणजे मिनि विधानसभा याप्रमाणेच असणार आहे. यासाठी लागणारी यंत्रणा, मनुष्यबळ आणि खर्चाचा कसा मेळ घातला जाणार असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

सभागृहात आवाज उठवणार

सत्तांतर होताच शिंदे सरकारने अनेक निवडणुकांचे स्वरुप बदलले आहे. पण वास्तविक पाहता हे शक्य होईल का याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणताही निर्णय घेणे उचित होणार नाही. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सभागृहात आपण आवाज उठवणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे सभागृहात ते आता काय भूमिका मांडणार हे देखील पहावे लागणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची अडचण समजेना

शिंदे सरकारची स्थापना होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला गेला आहे. असे असताना अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. केवळ दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे विस्ताराचे नेमके घोडे कुठे अडले असा प्रश्नही अजित पवार यांनी बारामतीमध्ये एकता इंग्लिश मिडीयम स्कूल इमारत उदघाटनप्रसंगी उपस्थित केला. एवढेच नाही तर कोणी ताम्रपट घेवून कोणी जन्माला येत नाही. त्यामुळे हे सरकार तरी किती दिवस टिकणार याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.