AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter : थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक मात्र, ‘या’ फळ बागेसाठी आहे धोक्याची घंटा, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पीके अधिकच बहरतात. शिवाय पिकांची वाढ जोमाने होते. मात्र, हे वातावरण सर्वच पिकांना पोषक आहे असे नाही कारण याच दरम्यान काही फळपिकांचे मोठे नुकसान होते. यामध्ये सर्वाधिक धोका आहे तो केळीच्या बागांना.

Winter : थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक मात्र, 'या' फळ बागेसाठी आहे धोक्याची घंटा, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 8:15 AM
Share

मुंबई : वाढत्या (Winter season) थंडीमुळे रब्बी हंगामातील पीके अधिकच बहरतात. शिवाय (Crop) पिकांची वाढ जोमाने होते. मात्र, हे वातावरण सर्वच पिकांना पोषक आहे असे नाही कारण याच दरम्यान काही (fruit pick) फळपिकांचे मोठे नुकसान होते. यामध्ये सर्वाधिक धोका आहे तो केळीच्या बागांना. केळीच्या झाडांचा रंग बदलला की, शेतकऱ्यांनी सावधानता बाळगायला हवी. अशा वेळी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशी अवलंबल्या तरच केळी बागेची जोपासना होणार आहे.

अखिल भारतीय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही बागा जोपासण्याबाबत शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिलेला आहे. हिवाळ्याच्या हंगामात किमान तापमान 10 अंशांच्या खाली आले की, केळीच्या आत बरीच क्रियाशीलता वाढते. त्यामुळे केळी वनस्पतीची वाढ थांबते आणि विविध प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येते.

हिवाळ्यात केळी बागावर होणारे परिणाम

10 अंश सेल्सिअसच्या कमी तापमानाची नोंद होताच केळीची नैसर्गिक वाढ थांबते. त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि गंभीर परिस्थितीत ऊती मारायला लागतात. अशावेळी केळीच्या बागा सर्वसामान्य दिसत असल्या तरी अधिकच्या गारव्यामुळे केळीच्या घडाची वाढ खुंटलेली असते. यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन कॅल्शियमच्या आणि बोरनच्या कमतरतेमुळेही अशीच लक्षणे उद्भवू शकतात. केळीच्या घडाचा आकार वाढलेला दिसतो पण आतमधून तो भाग पोखरला जाऊ शकतो. याला घसा खडू असे म्हणतात. त्यामुळे कधीकधी घड परिपक्व होण्यास 5-6 महिने लागतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात घडाची वाढ होत नाही. परिणामी अपेक्षित उत्पादनही मिळत नाही. त्यामुळे थंडी ही जरी इतर पिकांसाठी पोषक असली तरी मात्र, केळीवर विपरीत परिणाम करणारी आहे.

यामधून केळी बागेचा असा करा बचाव

टिश्यू कल्चर केळी मिळविण्याची सर्वात चांगली वेळ मे ते सप्टेंबर आहे. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम आगामी काळात लागवड केल्या जाणाऱ्या केळीवरही होतो. त्यामुळे या थंडीच्या काळात फुल लागवड होऊच नये. कारण हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे किंवा कधीकधी गुच्छ आभासी खोडातून योग्य प्रकारे बाहेर येत नाही म्हणून गुच्छाची वाढ चांगली नाही. टिश्यू कल्चरपासून तयार केलेले केळीतील फूल 9 व्या महिन्यात लागतात तर साकरने लावलेल्या केळीतील घड 10 व्या किंवा 11 व्या महिन्यात येतो.

सिंचनाची योग्य पध्दत

सर्वात महत्वाचे म्हणजे केळीच्या बागेसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते. ते वर्षभर दरमहा किमान १० सेंमी इष्टतम स्वरूपात वितरित करावे लागते. केळीच्या शेताची माती हिवाळ्यात नेहमीच ओलसर असणे आवश्यक आहे. त्यामुळे हिवाळा सुरु होण्यापूर्वी केळीच्या बागेत हलक्या प्रकारची मशागत करणे गरजेचे आहे. यामध्ये लहान ट्रक्टरच्या सहायाने नांगरण करुन घ्यावी तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होताच खताची मात्रा देणे गरजेचे आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होणार आहे. इतर हंगामात नाही पण थंडीमध्ये केळीच्या बागांची विशेष काळजी हाच यावरील पर्याय आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : पावसाने सरासरी ओलंडल्याने हरभरा पिकाची टक्केवारी वाढली

मजुरीविनाच ऊसतोडीचे काम, नांदेड जिल्ह्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

PM KISAN : बॅंक खात्यावर 10 वा हप्ता अन् नंतर 10 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ‘हा’ संदेश…! वाचा सविस्तर

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.