AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : नांदेडच्या शेतकऱ्यांचे ‘टायमिंग’ हुकले, पावसाची उघडीप तरीही चाढ्यावर मूठ, कोणता संभाव्य धोका?

आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 6.38 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी तो पेरणी योग्य पाऊस नाही. मात्र, खरिपातील सोयाबीन, तूर आणि मूग हे कमी पाण्यावरही तरली जाणारी पिके आहेत. त्यामुळे देगलूर भागातील शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता सोयाबीन, तूर आणि मुगाची पेरणी केली आहे.

Kharif Season : नांदेडच्या शेतकऱ्यांचे 'टायमिंग' हुकले, पावसाची उघडीप तरीही चाढ्यावर मूठ, कोणता संभाव्य धोका?
नांदेड जिल्ह्यातील देगलूर भागात अपेक्षित पाऊस नसतानाही पेरणीला सुरवात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 10:43 AM
Share

नांदेड : कृषी विभागासह राज्याच्या कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी आवाहन केले आहे की, (Kharif Sowing) पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय बियाणे जमिनीत गाढू नका म्हणून असे असताना (Nanded Farmer) नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची पेरणी करावी धावून अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाऊस होणही गरजेचे आहे. जिल्ह्यातील देगलूर भागात थोड्याबहुत प्रमाणात झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मुगाचा पेरा केला आहे. पणा (Rain) पावसाची अशीच उघडीप राहिली तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते शिवाय केलेला खर्च वाया जाण्याची भीती आता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. देगलूरसह इतर भागातही शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवण्याचे धाडस केले आहे.

अत्यल्प पावसावर तीन पिकांचा पेरा

आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 6.38 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी तो पेरणी योग्य पाऊस नाही. मात्र, खरिपातील सोयाबीन, तूर आणि मूग हे कमी पाण्यावरही तरली जाणारी पिके आहेत. त्यामुळे देगलूर भागातील शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता सोयाबीन, तूर आणि मुगाची पेरणी केली आहे. आता पुरेशा प्रमाणात जमिनीत ओल असेल पिकांची उगवण होईल पण त्यानंतरच्या वाढीसाठी पावसाचीच आवश्यकता असते.

कृषी विभागाचे काय आहे आवाहन?

यंदा पावसाने उशीर केला असला तरी पेरण्या लांबणीवर पडल्या तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. असे असले तरी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करणे हे धोक्याचे आहे. यामुळे पीक जोमात वाढत तर नाहीच पण उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. आता पिकांची उगवण झाली आणि वाढच झाली नाहीतर पुन्हा दुबार पेरणी ही ठरलेलीच आहे. त्यामुळे अधिकचा खर्च आणि अधिकचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेट अॅण्ड वॉच ची भूमिका घेणे गरजेचे आहे.

पेरणीमुळे नेमके नुकसान काय ?

खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून असतात. त्यामुळे पुरेशी ओल नसतानाही पेरणीचे धाडस केले तर पिकांची वाढ खुंटणार आहे. शिवाय ही पिके अल्पावधीची असतात. त्यामुळे प्रत्येक घटकाचा त्याच्यावर परिणाम हा होतोच. पावसाने अजून ओढ दिली तर एकरी 4 ते 5 हजाराचा खर्च करुन दुबार पेरणी करावीच लागणार आहे. त्यामुळे नांदेडच्या शेतकऱ्यांनी केलेली चूक इतरांनी करु नये एवढेच.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.