AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवामान बदलाचा शेतीवर परिणाम, पीकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत

Agricultural News : हवामान बदलाचा फटका शेतीला बसला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडून अनुदान जाहीर करण्याची विनंती केली आहे.

हवामान बदलाचा शेतीवर परिणाम, पीकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत
tomatoes
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 19, 2023 | 9:02 AM
Share

गणेश सोलंकी, बुलढाणा : संकट जणू काही शेतकऱ्यांच्या (Agricultural News) पाचवीलाच पुजलय की काय, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रात (maharashtra news)उभा राहिला आहे. त्याच कारणही तसचं आहे. आधी अस्मानी संकट, नंतर सुलतानी संकट, याच फेऱ्यात शेतकरी यंदा अडकताना दिसत आहे. मोठ्या मेहनतीने लागवड केलेली टोमॅटोची बाग, भर उन्हात पाणी देऊन मशागत करून उभी केली. मात्र एन उत्पन्नाच्या काळात टोमॅटोला फक्त दीड ते दोन रुपये किलोचा भाव मिळत असल्याने शेतकरी बुलढाणा (buldhana farmer news) जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पुन्हा एकदा अडचणीत आला आहे अशी माहिती मधुकर शिंगणे यांनी दिली आहे.

टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होत आहे

बुलढाणा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. किलोला दीड ते दोन रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटो तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होत आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणी सोडून दिली आहे. हजारो रुपये टोमॅटो लागवडीसाठी खर्च करूनही शेतकऱ्यांना भावा अभावी शेतातच टोमॅटो सोडून द्यावी लागत आहे. तर कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आला आहे. त्यामुळे आता अशा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर करावं अशी मागणी शेतकरी नेते, रविकांत तुपकर यांनी केली आहे.

अवकाळी पावसानं केलं नुकसान

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे फळांच्या बागांचं आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान केलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न पडला आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमान आहे. त्यामुळं अनेक पीकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. लोकं शेतकरी पावसाळा सुरु होण्याची वाट पाहत आहेत.

Follow Us
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट