AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या कारणामुळे महाराष्ट्रात टोमॅटोचे दर वाढणार, टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी घेतला निर्णय

देशात सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक शहरात टोमॅटो इतका महाग झाला आहे की, लोकांनी टोमॅटो खरेदी करणं बंद केलंय.

या कारणामुळे महाराष्ट्रात  टोमॅटोचे दर वाढणार, टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी घेतला निर्णय
| Updated on: Jul 13, 2023 | 11:46 AM
Share

नागपूर : टोमॅटोचे दर (tomato rate increased) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक टोकाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता टोमॅटो खरेदी करणार आहे. देशातल्या बऱ्याच भागात टोमॅटोचे दर २०० रुपयांपर्यंत गेले आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे सामान्य लोकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे. या कारणामुळेचं केंद्र सरकार (central governmet) नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक महासंघाकडून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. खरेदी केलेले टोमॅटो दिल्ली, कोलकाता, कानपूर आणि पाटण्याच्या बाजारात विक्री होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटोचे दर आणखी वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. मान्सून निश्चित वेळेत दाखल न झाल्यामुळे टोमॅटोचे दर (nagpur news) वाढले आहेत.

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा आणि रब्बी पिकाचं नुकसान झालं आहे. एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामध्ये अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर रब्बी हंगामातील सगळ्या पिकांचं नुकसान झालं आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पाऊस देशात दाखल होतो. परंतु यंदा एक महिना मान्सून पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे त्याचा परिणाम शेतीवर अधिक झाला आहे. शेतीत भाजीपाला पिकला नसल्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्याचा दर अधिक झाला आहे. पुढच्या काही दिवसात भाजीपाल्याचे दर कमी येतील असं सांगण्यात येत आहे.

मान्सून सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समजली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.