AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका

PM Modi : गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषद पार पडली. या परिषदेचे ठिकाण 4 वेळा बदलण्यात आले. यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आता पंतप्रधान मोदी यांनीही भाष्य केले आहे.

पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका
PM Modi Image Credit source: Google
| Updated on: Mar 07, 2026 | 8:14 PM
Share

पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली. सिलीगुडीतील बागडोग्रा येथील गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिलीगुडी उपविभागातील विधाननगर भागात पोहोचल्या. याठिकाणी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला आयोजकांनी विधाननगरमध्ये परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर चार वेळा स्थळ बदलण्यात आले. यावरून राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी

गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषद पार पडली. याआधी ही परिषद विधाननगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने बागडोगरा विमानतळाजवळील गोंसाईपूरमध्ये बैठक आयोजित करण्याची परवानगी दिली होती. यानंतर राष्ट्रपती विधाननगर मध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘प्रशासनाच्या मनात काय होते हे मला माहित नाही; त्यांनी मला येथे आणले नाही. मी त्यांना सांगितले की मला कोणतीही समस्या दिसत नाही. मी बंगालची मुलगी आहे, तरीही मला इथे येऊ दिले जात नाही. ममता माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे; मला माहित नाही, कदाचित ती माझ्यावर रागावली असेल.’

PM मोदींची बंगाल सरकारवर टीका

बंगाल सरकारच्या परिषदेचे ठिकाण बदलण्याच्या निर्णयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हे लज्जास्पद आणि अभूतपूर्व आहे. लोकशाही आणि आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणावर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण निराश झाला आहे. आदिवासी समुदायातील राष्ट्रपती यांनी व्यक्त केलेल्या वेदना आणि व्यथा यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड दुःख निर्माण झाले आहे.

पश्चिम बंगालच्या तृणमूल सरकारने खरोखरच सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राष्ट्रपतींच्या या अपमानासाठी त्यांचे प्रशासन जबाबदार आहे. पश्चिम बंगाल सरकारकडून संथाल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाला इतके दुर्लक्षितपणे वागवले जाणे तितकेच दुर्दैवी आहे. राष्ट्रपतींचे पद राजकारणाच्या वर आहे आणि या पदाच्या पावित्र्याचा नेहमीच आदर केला पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चांगली समजूतदारपणा निर्माण होईल अशी आशा आहे.

Follow Us
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल.
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?.
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल.
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले.
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?.