AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी

अवघ्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होतं. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे.

अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी
Unseasonal RainImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 18, 2023 | 9:53 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हा पूर्णतः उध्वस्त झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर तळोदा धडगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्या चांगलाचं फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील (rabi season) गहू, मका, हरभरा, ज्वारी या पिकाचे नुकसान झालं आहे. तर त्यासोबत फळबागातील पपई, केळीचे, खरबूज, आणि टरबूज देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पंचनामे करून शासन तात्काळ मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र कर्मचारी संपर्क गेले असल्यामुळे शासनाला पंचनामे आकडेवारी कशी मिळणार असा प्रश्न आता शेतकरी राजासमोर उपस्थित झालेला आहे. त्यामुळे शासनाने कागदांची वाट न पाहता शेतकरीराजाला त्वरित मदत करावी एवढी अपेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी (Farmer News) करू लागले आहेत.

धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले

अवघ्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होतं. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील सिंदबन, छडवेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून, अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे गहू, मका, हरभरा, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पपई आणि केळीच्या फळबागांनाही याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी आता सरसकट मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट आता मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साखरी तालुक्यातील सिंदमान छडवेल या परिसरात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्यामुळे या भागातला शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अवघ्या दहा दिवसात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गारपीटीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.