AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी

अवघ्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होतं. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे.

अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी
Unseasonal RainImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 18, 2023 | 9:53 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हा पूर्णतः उध्वस्त झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर तळोदा धडगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्या चांगलाचं फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील (rabi season) गहू, मका, हरभरा, ज्वारी या पिकाचे नुकसान झालं आहे. तर त्यासोबत फळबागातील पपई, केळीचे, खरबूज, आणि टरबूज देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पंचनामे करून शासन तात्काळ मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र कर्मचारी संपर्क गेले असल्यामुळे शासनाला पंचनामे आकडेवारी कशी मिळणार असा प्रश्न आता शेतकरी राजासमोर उपस्थित झालेला आहे. त्यामुळे शासनाने कागदांची वाट न पाहता शेतकरीराजाला त्वरित मदत करावी एवढी अपेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी (Farmer News) करू लागले आहेत.

धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले

अवघ्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होतं. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील सिंदबन, छडवेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून, अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे गहू, मका, हरभरा, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पपई आणि केळीच्या फळबागांनाही याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी आता सरसकट मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट आता मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साखरी तालुक्यातील सिंदमान छडवेल या परिसरात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्यामुळे या भागातला शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अवघ्या दहा दिवसात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गारपीटीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.