AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी

अवघ्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होतं. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे.

अतिवृष्टीचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाचं फटका, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट मदत करावी
Unseasonal RainImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 18, 2023 | 9:53 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हा पूर्णतः उध्वस्त झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर तळोदा धडगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीच्या चांगलाचं फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील (rabi season) गहू, मका, हरभरा, ज्वारी या पिकाचे नुकसान झालं आहे. तर त्यासोबत फळबागातील पपई, केळीचे, खरबूज, आणि टरबूज देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पंचनामे करून शासन तात्काळ मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र कर्मचारी संपर्क गेले असल्यामुळे शासनाला पंचनामे आकडेवारी कशी मिळणार असा प्रश्न आता शेतकरी राजासमोर उपस्थित झालेला आहे. त्यामुळे शासनाने कागदांची वाट न पाहता शेतकरीराजाला त्वरित मदत करावी एवढी अपेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी (Farmer News) करू लागले आहेत.

धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले

अवघ्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले होतं. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच, आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील सिंदबन, छडवेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून, अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे गहू, मका, हरभरा, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पपई आणि केळीच्या फळबागांनाही याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी आता सरसकट मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सरकारने थेट सरसकट आता मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साखरी तालुक्यातील सिंदमान छडवेल या परिसरात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्यामुळे या भागातला शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अवघ्या दहा दिवसात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गारपीटीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?