AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : या जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच

विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यातील शेवटचे गाव पांगराबंदी येथील शेतकरी बगाडे यांचा दोन एकर डाळिंबाचा बगीचा गारपीटीमुळे उद्धवस्त झाला आहे.

Unseasonal Rain : या जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच
unseasonal rain Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 18, 2023 | 9:07 AM
Share

वाशिम : गेल्या दोन दिवसांपासून वाशीम (Washim) जिल्ह्यात विजेच्या कडकडाट अवकाळी पाऊस पडत आहे. आजही जिल्ह्यातील अनेक भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने (unseasonal rain) हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावाला गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला होता. बोराच्या आकाराच्या गाराने परिसर पांढराशुभ्र झाला होता. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मागच्या आठदिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. पावसाने रब्बी (rabi season) पिकाचं मोठं नुकसान केलं असल्याची चित्र दिसत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हतबल

या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील फळबाग उध्वस्त झाल्यात तसेच गहू, हरभरा, भाजीपाला, प्रचंड नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. काल सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली असल्याचं चित्र वाशिम जिल्ह्यात अनेक भागात पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले

विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यातील शेवटचे गाव पांगराबंदी येथील शेतकरी बगाडे यांचा दोन एकर डाळिंबाचा बगीचा गारपीटीमुळे उद्धवस्त झाला आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सगळे लक्ष सरकारी मदतीकडे लागले आहे.

वीजेच्या अनेक घटना घडल्या आहेत

मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर येथे रात्री साडेआठच्या सुमारास हरिचंद्र काळू महाजन यांच्या घरावरची टिन पत्रे अवकाळी पावसाने उध्वस्त झाली आहेत. राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर गरज असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसात वीजेच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?