AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरने मुलगा हिरवला, पत्नीचं सोनं विकून पेरणी, बैलाऐवजी स्वत:ला जुंपून मशागत

बियाणे आणि खते एवढीच खरेदी गहाण दागिन्यांतून झाल्यावर, काकरे फाडण्याच्या कामात मात्र बैलांऐवजी स्वतःलाच जुंपलं. (Wardha farmer)

कॅन्सरने मुलगा हिरवला, पत्नीचं सोनं विकून पेरणी, बैलाऐवजी स्वत:ला जुंपून मशागत
| Updated on: Jun 20, 2020 | 12:08 PM
Share

वर्धा : शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या अडचणी अद्याप सुटल्या नाहीत. ऐन खरिपाचा हंगाम असताना हाताशी पैसा नाही. जो होता तोही आपल्या कॅन्सरग्रस्त मुलाचा जीव वाचविण्यात घालविला, पण पैसे जीव वाचवू शकले नाही. आता करावं काय? अशा पेचात असणाऱ्या शेतकऱ्याने पत्नीचे दागिने गहाण ठेऊन पेरणी आटोपली. बियाणे आणि खते एवढीच खरेदी गहाण दागिन्यांतून झाल्यावर, काकरे फाडण्याच्या कामात मात्र बैलांऐवजी स्वतःलाच जुंपलं. (Wardha farmer)

जिल्ह्यातील नारा येथील रमेश बनसोड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यावर सन 2008 मध्ये पीककर्ज घेतलं, तेव्हापासून परिस्थिती नसल्याने कर्ज फेडू शकले नाहीत. सरकारने कर्जमाफी केली मात्र त्या कर्जमाफीमध्ये आमची कर्जमाफी झाली नाही त्यामुळे पुन्हा शेतीवर कर्ज मिळालं नाही, अशी आपबिती शेतकरी रमेश यांनी मांडली.

शेतात पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने रमेश यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील पोत, कानातले सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यातून फक्त शेतीसाठी बियाणे आणि खतं घेण्यात आली. शेतीत लागवड करण्यासाठी बैलजोडीची गरज असते, मात्र त्याचं भाडे देणे होत नसल्याने शेतकरी रमेश यांनी स्वतः काकरी बनवली आणि दिवसभर बैलासारखी ओढून कपाशी लागवडीसाठी शेतात काकर फाडले. त्यानंतर पत्नी ,पुतणे शेतीच्या कपाशी लागवड करण्यासाठी मदत करु लागले. यातून पैसा खर्च होत नाही मात्र बियाणे आणि खत यावर पैसे खर्च केला आहे.

“अचानक माझ्या मुलाला ब्लड कॅन्सरच्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. तेवढे पैसे त्याच्या आजाराला लावावे लागले. अनेकांनी आर्थिक मदत केली मात्र अक्षयने अखेर जगाचा निरोप घेतला. त्याच्या आजारासाठी अनेकांकडून कर्ज घेतले,आता खरीप हंगामाला सुरुवात झाली, शेती पेरणी करायची कशी हा प्रश्न सतावत असताना, पत्नीच्या गळ्यातील पोत. कानातले दागिने गहाण ठेवले. आता त्यातून मिळालेल्या पैशात शेती करत आहे.

(Wardha farmer)

संबंधित बातम्या 

केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक, शेतकरी आणि मजुरांसह इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा  

PM Modi | अर्थव्यवस्था पुन्हा उभी करणार, देशातील शेतकरी-उद्योजकांवर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी 

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.