AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धरण तेलंगणाचं, नुकसान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं, 25 गावच्या शिवारातील शेतजमिनी गायब… काय आहे प्रकरण?

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन झालेली घट ही भरुन काढता येते मात्र, जर शेती खरडून गेली तर उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावच्या शेतकऱ्यांसमोर आहे. बरं हे काही अधिकच्या पावसामुळे नाही तेलंगणा येथील मेडीगट्टा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नुकसान होत आहे. धरणातील पाण्याला वहिवाट करुन दिल्याने शेतजमिनी या वाहून गेल्या आहेत. धरणाचे पाणी थेट शेतजमिनीमध्ये घुसत असल्याने उत्पादन तर सोडाच पण जमिनीचा दर्जाही कमी झाला आहे.

धरण तेलंगणाचं, नुकसान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं, 25 गावच्या शिवारातील शेतजमिनी गायब... काय आहे प्रकरण?
तेलंगणा येथील धरणामुळे गडचिरोली येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई देण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 20, 2022 | 11:02 AM
Share

गडचिरोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन झालेली घट ही भरुन काढता येते मात्र, जर शेती खरडून गेली तर उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावच्या शेतकऱ्यांसमोर आहे. बरं हे काही अधिकच्या पावसामुळे नाही तेलंगणा येथील मेडीगट्टा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नुकसान होत आहे. (Dam) धरणातील पाण्याला वहिवाट करुन दिल्याने (farm Land) शेतजमिनी या वाहून गेल्या आहेत. धरणाचे पाणी थेट शेतजमिनीमध्ये घुसत असल्याने (Production) उत्पादन तर सोडाच पण जमिनीचा दर्जाही कमी झाला आहे. एकीकडे निचरा होणाऱ्या शेतजमिनीवर पीक घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाते तर दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातील शेकडो एक्कर जमिन हा कायम पाण्यातच असते. त्यामुळे या भागातील शेतजमिनींचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. गेल्या तीन वर्षापासून हीच अवस्था असल्याने शेतकरी हताश झाले आहेत

निसर्गाचा लहरीपणा त्यात प्रशासनाचा मनमानी

गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट ही तर ठरलेली आहे. यंदा खरीप हंगामातील सर्व पीके ही पाण्यातच गेली आहेत. त्यामुळे उत्पादन तर शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही पण रब्बी हंगामातही या शेतजमिनींचा वापर शेतकऱ्यांना करता आलेला नाही. अजून जमिनींमध्ये पाणी साचून राहिलेले आहे. मेडीगट्टा धरणाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत येत आहे.त्याअनुशंगाने मदत तर नाहीच पण प्रशासनाकडून सर्वेक्षणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या धरणातील पाण्यामुळे किती क्षेत्राचे नुकासान झाले आहे याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

‘या’ गावच्या शेतकऱ्यांचे झाले नुकसान

मेडीगट्टा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. यामध्ये गुमलकोंडा , मुकडीगुटटा , मुत्तापूर माल , मुत्तापूर चेक , टेकडामोटला , सुंकरअली , असरअल्ली , गोल्लागुडम माल , बोराईगुडम , गेर्रापल्ली , जंगलपल्ली , बालमुत्यमपल्ली , अंकीसा , लक्ष्मीदेवपेठा , कंबलपेठा , चिंतारेवला , नडीकुडा , कोत्तापल्ली , पोचमपल्ली , रंगधामपेठा , गंजीरामन्नापल्ली या गावांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून उत्पादन तर नाहीच पण शेतकऱ्यांचा अधिकचा खर्च या शेत जमिनीवर झालेला आहे.

भाजपा पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन

सिरोंचा तालुक्यातील अनेक गावाच्या शेतजमिनी ह्या धरणातील पाण्यामुळे बाधित झालेल्या आहेत. तर काही जमिनी ह्या खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांचा ज्यावर उदरनिर्वाह आहे त्या जमिनीच गायब झाल्या तरी प्रशासनाकडून व राज्य सरकारकडून दखल घेतली जात नाही. गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांची ही समस्या कायम आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या :

Organic Farming : केंद्राच्या सूचना अन् वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांची अंमलबजावणी, केवळ सल्लाच नाही तर…

ज्वारीचे क्षेत्र तर घटले, आता भौगोलिक मानांकन टिकवून ठेवण्याचे ‘टार्गेट’..! काय आहेत मालदांडी ज्वारीची वेगळेपण?

Rice Export : बासमती तांदळाचा सुगंधही दरवळला अन् दरही वाढला, काय आहेत कारणे?

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद