AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : ‘मिनी ऑरेंज सिटी’ मध्ये वाढणार फळबागेचे क्षेत्र, पोषक वातावरणामुळे वाशिममध्ये पीक पध्दतीमध्ये बदल

पावसामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप कसे बदलते याची प्रचिती राज्यामध्ये येत आहे. गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या पेरण्या आता वेगात होत आहेत. तर उत्पन्न वाढीसाठी फळबागावरही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा फळाचे क्षेत्र वाढले आहे. केवळ वनोजा शहर क्षेत्रातच नाही तर परिसरातील शेतकरीही आता संत्रा लागवडीवर भऱ देत आहे.

Washim : 'मिनी ऑरेंज सिटी' मध्ये वाढणार फळबागेचे क्षेत्र, पोषक वातावरणामुळे वाशिममध्ये पीक पध्दतीमध्ये बदल
वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत शिवाय संत्रा फळबागांचे क्षेत्रही वाढत आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 10, 2022 | 9:35 AM
Share

वाशिम : राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे केवळ (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांसाठीच पोषक वातावरण झाले असे नाही तर शेतीचे चित्रच बदलून गेले आहे. आतापर्यंत खरीप हंगामातील सरासरी एवढा तरी पेरा होणार की नाही अशी शंका होती मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे (Orchard area) फळबागेचेही क्षेत्र वाढणार आहे. वाशिम जिल्ह्यातील वनोजा हे मिनी (Orange City) ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रावर तर संत्रा लागवड होतच आहे पण लगतच्या भागातील शेतकऱ्यांनी संत्रा लागवडीला पसंती दिली आहे. त्यामुळे केवळ खरिपाचाचे नाहीतर शेतीचे चित्र बदलत आहे. खरीप हंगामातील पिकांमध्ये आंतरपिक म्हणून संत्राची लागवड केली जात आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

पावसामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप कसे बदलते याची प्रचिती राज्यामध्ये येत आहे. गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या पेरण्या आता वेगात होत आहेत. तर उत्पन्न वाढीसाठी फळबागावरही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा फळाचे क्षेत्र वाढले आहे. केवळ वनोजा शहर क्षेत्रातच नाही तर परिसरातील शेतकरीही आता संत्रा लागवडीवर भऱ देत आहे. पावसामुळे जमिनीतील ओल आणि वाढीसाठी पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे कलम केलेल्या रोपांची लागवड केली जात आहे.

वनोजा आदर्श गाव, इतर शेतकऱ्यांनाही फायदा

वाशिम जिल्ह्यातील वनोजा हे आदर्श गाव आहे. फळबाग क्षेत्रातील योगदान आणि संत्रा फळाचा दर्जा उत्तम असल्याने या गावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. संत्रा फळबागा मोठ्या प्रमाणावर असुन शेतकरी संत्रा उत्पादनही चांगल्या प्रकारे घेतात. त्यामुळे परिसरतील ईतर शेतकरीही संत्रा फळबागे कडे वळताना दिसत आहेत. आता खरिपातील पेरण्या झाल्या असून या पिकांमध्येच आंतरपिक म्हणून संत्राची लागवड केली जात आहे. पडत्या पावसामध्ये शेतकरी हे काम करीत आहेत.

अशी करा लागवड

संत्र्याची कलमे मान्सूनचा 3 ते 4 वेळा पाऊस पडून गेल्यानंतर व जमिनीत योग्य अशा ओल झाल्यावर लावावीत. कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना व खड्डयात पुरेशी ओल असताना लावावीत. कलमांचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खचण्याचा संभाव नसतो. शेतकऱ्यांच्या या अनोखा प्रयोगाला कृषी विभागाचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांबरोबर शेतकरी हे फळबागाचेही उत्पादन घेत आहेत.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?