AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar : पावसाची प्रतिक्षा संपली, आता पेरणीची लगबग, बियाणे-खतांसाठी शेतकऱ्यांची वर्दळ

कडधान्य पेऱ्याचा कालावधी उलटून गेला आहे. आता उडीद, मुगाचा पेरा झाला तरी उत्पादनात मात्र घट होणार अहे. त्यामुळे शेतकरी आता थेट सोयाबीन आणि कापसावर भर देत आहेत .सोयाबीनसह कापूस, तूर, धान पिकाचा पेरा हा 15 जुलैपर्यंत झाला तरी उत्पादनात घट होणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

Nandurbar : पावसाची प्रतिक्षा संपली, आता पेरणीची लगबग, बियाणे-खतांसाठी शेतकऱ्यांची वर्दळ
नंदुहबार जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 09, 2022 | 12:12 PM
Share

नंदुरबार : हंगामाच्या सुरवातीपासून उत्तर महाराष्ट्रात वरुणराजाची कृपादृष्टी राहिली असली तरी (Nandurbar) नंदुरबार जिल्हा अपवाद होता. मात्र, शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने (Kharif Season) खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकूणच सव्वा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत तर पेरणी कामांनाही वेग येणार असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच (Market) बाजारपेठेत खत, बियाणे दाखल झाले होते. पण महागडी बियाणे खरेदी करायचीच कशाला असा सवाल शेतकऱ्यांपुढे होता. मात्र, आता चित्र बदलल्याने नंदुरबार शहादा नवापूर तळोदा अक्कलकुवा या शहरात कृषी सेवा केंद्रांव खत बियाणे आणि विविध शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासूनच गर्दी करत आहेत.

बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी

पावसाने ओढ दिल्याचा परिणाम थेट बाजारपेठेवरही झाला होता. पाऊसच गायब झाल्याने बियाणांची खरेदी करावी की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेमध्येदेखील नवचैतन्य निर्माण झाले आहे. खतासह बियाणांची खरेदी केली जात आहे. अगोदरच पेरणी कामांना उशीर झाला आहे. त्यामुळे आता वाफसा होताच पेरणी कामांना वेग येणार आहे. खत-बियाणांबरोबर शेती साहित्यही खरेदीसाठी गर्दी होत आहे. खत-बियाणांमधून शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून तालुकानिहाय कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे.

शेतकऱ्यांचा भर सोयाबीन, कापसावर

कडधान्य पेऱ्याचा कालावधी उलटून गेला आहे. आता उडीद, मुगाचा पेरा झाला तरी उत्पादनात मात्र घट होणार अहे. त्यामुळे शेतकरी आता थेट सोयाबीन आणि कापसावर भर देत आहेत .सोयाबीनसह कापूस, तूर, धान पिकाचा पेरा हा 15 जुलैपर्यंत झाला तरी उत्पादनात घट होणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन आणि कापसावर भर देत आहेत. शिवाय कमी कालावधीत येणाऱ्या वाणावर शेतकरी लक्ष केंद्रीत केले आहे.

कृषी विभागाचा काय सल्ला?

खरिपाची पेरणी करावी धावून अशी म्हण आहे. पण यंदा पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत. आता पावसाने हजेरी लावली आहे मात्र, पेरणीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेला सल्लाही महत्वाचा ठरणार आहे. आता पेरणीला उशीर झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर तर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीत पेरणी न करता किमान 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप