AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season: शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केला धोरणांमध्ये बदल, खरिपात उत्पादकता वाढवण्याची संधी

शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची गरज भासते. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व पात्र शेतकऱ्याला विहित वेळेत पीककर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने संबंधित विभागांनी कर्ज वाटपाचे नियोजन करावे. पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत समन्वय साधुन त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.

Kharif Season: शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केला धोरणांमध्ये बदल, खरिपात उत्पादकता वाढवण्याची संधी
आरोग्यमंत्री राजेश टोपेImage Credit source: tv9
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 10, 2022 | 12:17 PM
Share

जालना : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य सरकार विविध योजना आणि सोई-सुविधा राबवत आहे. यंदा तर अडचणीच्या काळात (Crop Loan) पीककर्जाचा उपयोग व्हावा म्हणून राज्य सरकारने धोरणांमध्ये बदल केला आहे. अर्थ संकल्प सादर होताच मे महिन्याच्या 1 तारखेपासूनच पीककर्ज वितरणाचे आदेश संबंधित (Bank Loan) बॅंकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे (Kharif Season) खरीप पेरणी सुरु होण्यापूर्वी ही कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यास त्याचा योग्य वापर होणार आहे. हा बदल यंदाच्या वर्षापासूनच करण्यात आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला लागावे, खत, बी-बियाणे हे कमी न पडू देण्याची जबाबदारी सरकरची आहे. त्याचा वेळेत पुरवठा होईल तुम्ही उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी खरीपपुर्व हंगाम बैठकीत शेतकऱ्यांना केले आहे.

पीककर्जामध्ये बॅंकांची भूमिका महत्वाची

शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची गरज भासते. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व पात्र शेतकऱ्याला विहित वेळेत पीककर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने संबंधित विभागांनी कर्ज वाटपाचे नियोजन करावे. पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत समन्वय साधुन त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. ज्या बँकां त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत, अशा बँकांमधील शासकीय ठेवी तातडीने काढून घेण्यात याव्यात व या बँकांची तक्रार रिजर्व्ह बँकेकडे करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीज जोडणीही वेळेत मिळेल यासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही पालकमंत्री टोपे यांनी दिली. नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना ही शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजनेच्या माध्यमातुन कृषिविषयक कामांना देण्यात येणाऱ्या पूर्वसंमती मंजुरीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असुन शेतकऱ्यांना कामांसाठी पूर्वसंमती ही वेळेत मिळाली पाहिजे.

जालना जिल्ह्यातील खरिपाची स्थिती

आढावा बैठकी दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले की, खरीप हंगाम 2022 मध्ये जिल्ह्यात 6 लाख 13 हजार हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याासाठी 1 लाख 66 हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. बियाणे बदल दरानुसार 71 हजार 142 क्विंटल बियाणे आवश्यक असुन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे ए.जे. बोराडे, कल्याण सपाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा