AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea : मुदतीपूर्वीच हरभरा खरेदी केंद्र बंद, राज्यातील हरभऱ्याची स्थिती काय?

राज्यात यंदा हरभऱ्याची उत्पादकता वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ती हरभरा केंद्राची. 1 मार्चपासून हरभरा खरेदी केंद्र सुरुही झाली पण सातत्याने बारदाणाच्या आभाव, साठवणूकीची समस्या यामुळे नियमित सुरु राहिली नाही. परिणामी खरेदीला दिरंगाई झाली. 29 मे पर्यंत राज्यातील खरेदी केंद्र ही सुरु राहणार होती. पण 23 मे रोजीच अचानक खरेदी बंद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे खरेदी केंद्राहबाहेर असलेल्या शेतकऱ्यांचा देखील माल घेतला गेला नाही.

Chickpea : मुदतीपूर्वीच हरभरा खरेदी केंद्र बंद, राज्यातील हरभऱ्याची स्थिती काय?
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 10, 2022 | 2:44 PM
Share

पुणे : ‘नाफेड’च्या माध्यमातून सुरु करण्याता अलेली हरभरा खरेदी यंदा मुदतीपूर्वीच बंद झाली आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या मागणीनंतर पुन्हा सुरु झालेली ही केंद्र अवघ्या दोन दिवसांमध्ये बंद झाल्याने (Chickpea Crop) हरभरा उत्पादकांची मोठी अडचण झाली आहे. राज्यभरातील 5 लाख शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र, ठरवून देण्यात आलेल्या वेळेपूर्वीच ही (Shopping Center) खरेदी केंद्र बंद झाल्याने 1 लाख शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे करायाचे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. 29 मे रोजी बंद होणारी ही केंद्र 23 मे रोजी अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी करावे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत ना (State Government) राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले आहे ना संबंधित यंत्रणेने. त्यामुळे उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.

खरेदी केंद्रांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर

राज्यात यंदा हरभऱ्याची उत्पादकता वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ती हरभरा केंद्राची. 1 मार्चपासून हरभरा खरेदी केंद्र सुरुही झाली पण सातत्याने बारदाणाच्या आभाव, साठवणूकीची समस्या यामुळे नियमित सुरु राहिली नाही. परिणामी खरेदीला दिरंगाई झाली. 29 मे पर्यंत राज्यातील खरेदी केंद्र ही सुरु राहणार होती. पण 23 मे रोजीच अचानक खरेदी बंद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे खरेदी केंद्राहबाहेर असलेल्या शेतकऱ्यांचा देखील माल घेतला गेला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांची मागणी आणि होणारी गैरसोय पाहता 17 मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांचीच खऱेदी असा निर्णय झाला. मात्र, तसे न होता दोनच दिवसांमध्ये खरेदी केंद्र ही बंद झाली आहेत. त्यामुळे खरेदी केंद्राच्या बदलत्या धोरणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

नोंदणी करुनही विक्री नाही

खरेदी केंद्रावर पिकाची विक्री करण्यासाठी आगोदर नोंदणी आवश्यक असते. त्यामुळे राज्यभरातील 5 लाख शेतकऱ्यांनी अधिकृत नोंदणीही केली. पण 1 लाख 10 हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यापूर्वीच राज्यातील खरेदी केंद्र ही बंद झाली. त्यामुळे नोंदणी करुनही आता या शेतकऱ्यांना कवडीमोल दरात खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याची विक्री करावी लागणार आहे. तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे त्याबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

अन्यथा फरक रक्कम अदा करावी

हरभरा खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला होता. खुल्या बाजारपेठेपेक्षा प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना 900 रुपये अधिकचा दर मिळत होता. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 900 रुपये फरक देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र, खरेदी केंद्र बंद केल्यापासून नाफेडने आतापर्यंत भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी नेमके करावे काय असा सवाल आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार