AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Road Tax: गाड्या आणखी महागणार, सरकार रोड टॅक्स वाढवण्याच्या तयारीत

देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. याआधी सोमवारी, भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India (MSI) ने त्यांच्या संपूर्ण मॉडेल रेंजच्या किमती 0.9 टक्के आणि 1.9 टक्क्यांच्या दरम्यान तत्काळ प्रभावाने वाढवल्या आहेत.

Road Tax: गाड्या आणखी महागणार, सरकार रोड टॅक्स वाढवण्याच्या तयारीत
Vehicles Image Credit source: PTI
| Updated on: Apr 19, 2022 | 5:33 PM
Share

Road Tax: तुम्ही दिल्लीत (Delhi) राहत असाल आणि कार घेण्याचा विचार करत असाल, तर हे काम लवकर पूर्ण करा. कारण येत्या काही दिवसांत दिल्लीत कार खरेदी करणे तुम्हाला महागात पडू (Car Price Hike) शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत व्यावसायिक वाहने (कमर्शियल व्हेईकल), कार आणि एसयूव्हीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण परिवहन विभागाने काही ठराविक श्रेणींच्या वाहनांवरील रोड टॅक्स (Delhi Road Tax) वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. दिल्लीतील खासगी वाहनांवरील रोड टॅक्स सध्या इंधनाचा प्रकार आणि प्राईस रेंजनुसार 12.5 टक्के आहे. दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने 2022-23 च्या वार्षिक बजेटमध्ये विविध कर आणि शुल्कांमधून 2,000 कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

यासोबतच देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. याआधी सोमवारी, भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India (MSI) ने त्यांच्या संपूर्ण मॉडेल रेंजच्या किमती 0.9 टक्के आणि 1.9 टक्क्यांच्या दरम्यान तत्काळ प्रभावाने वाढवल्या आहेत. कंपनी, जी सध्या अल्टो ते एस-क्रॉस पर्यंत कारची रेंज विकते, त्यांनी वाढत्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीवर 18 एप्रिलपासून दरवाढ लागू होऊन, सर्व मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमतींमध्ये (नवी दिल्ली) 1.3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यात, दिल्ली परिवहन विभागाने बस मार्गांचे उल्लंघन करणाऱ्या छोट्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसेससाठी निश्चित केलेल्या लेनमध्ये पार्क केलेली 50 हून अधिक वाहने हटवली असून या वाहनांच्या चालकांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. टो केलेल्या वाहनांमध्ये छोट्या कार, ऑटो, ई-रिक्षा आणि दुचाकी यांचा समावेश होतो.

महिंद्रा, टोयोटाच्या गाड्या महागल्या

यासह, महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या आठवड्यात त्यांच्या वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ही वाढ सुमारे 63,000 रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे, टोयोटा किर्लोस्कर मोटरने 1 एप्रिलपासून आपल्या संपूर्ण मॉडेल श्रेणीच्या किमतीत 4 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. याशिवाय लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडी, मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्ल्यू यांनीही नुकतीच दरवाढीची घोषणा केली आहे.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.