AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2023 : केंद्राच्या अर्थसंकल्पाचं स्वागत की विरोध?; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया… म्हणाले, सामान्यांना गाजर…

आपला देश कृषी प्रधान आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होत नाही. उत्पादित माल बाजारपेठेत येत नाही. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.

Budget 2023 : केंद्राच्या अर्थसंकल्पाचं स्वागत की विरोध?; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया... म्हणाले, सामान्यांना गाजर...
union budget 2023Image Credit source: sansad tv
| Edited By: | Updated on: Feb 01, 2023 | 2:26 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा बजेट मांडण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांकडून या अर्थसंकल्पाचं वर्णन ऐतिहासिक असं करण्यता येत आहे. मात्र, ठाकरे गटाने या बजेटवर सडकून टीका केली आहे. केंद्राचा अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडलेला आहे. या अर्थसंकल्पातून सामान्यांना गाजर दाखवण्यात आलं आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मीडियाशी संवाद साधताना केली आहे.

मध्यमवर्गीयांचे संपूर्ण आयुष्य होरपळत गेले. त्यांच्या्साठी इपीएसचा एक शब्द नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी कामगार आणि बेरोजगारांसाठी या बजेटमध्ये काहीही नाही. भाजपचे प्रत्येक निर्णय सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या कधीच महत्त्वाचे नसतात. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट मांडला आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.

गाजर दाखवलं

अर्थसंकल्पातून कर्नाटकाला मोठं पॅकेज दिलं आहे. त्यावरही अरविंद सावंत यांनी टीका केली. कर्नाटकाला केंद्र सरकारने 5 हजार 300 कोटी रुपये दिले आहेत. पण महाराष्ट्राला काहीही दिलं नाही. अर्थसंकल्पातून सामान्यांना गाजर दाखवण्याचं काम झालं आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

महापालिकेचा अर्थसंकल्प आहे की केंद्राचा?

निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जुन्याच योजनांना नवीन नावं दिली आहेत. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प आहे की केंद्र सरकारचा? असा संतप्त सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारला हे कळायला हवं की दुष्काळ फक्त कर्नाटकात नाही.

निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन एससी, एसटी, ओबीसी योजनांचा दोन तीन वेळा उल्लेख केला. कररचनेत थोडा बदल केलाय. त्यानं थोडा दिलासा मिळलाय, असं सावंत म्हणाले.

त्या घोषणांचं काय झालं?

खासदार राजन विचारे यांनीही या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. 2024 च्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन हा अर्थसंकल्प मांडला आहे. सर्वाधिक महसूल मुंबईतून येतो. जीएसटी सारख्या टॅक्समध्ये सवलत द्यायला हवी होती. पण तसं काही झालं नाही. गेल्या 5 वर्षात केलेल्या घोषणांचं काय झालं?, असा सवाल खासदार राजन विचारे यांनी केला.

तोंडाला पानं पुसली

आपला देश कृषी प्रधान आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होत नाही. उत्पादित माल बाजारपेठेत येत नाही. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. श्री अन्न योजना काय आहे हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.

भूलथापांचा अर्थसंकल्प

देशात अल्पसंख्याक वर्ग मोठा आहे. बौद्ध, मुस्लिम, जैन समाजावर मोठा अन्याय झालाय. महिलांसंदर्भात फसव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला विशेष पॅकेज देतील अशी अपेक्षा होती. पण आमची घोर निराशा केली आहे. हा अर्थसंकल्प भूलथापांचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय