AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EP 10 : Bus, Evadach Swapna Aahe | नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा काय?

नाशिकच्या विपुल याने पुण्यातील (Pune) एका प्रख्यात संस्थेतून 2020 मध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगचं(Mechnicial Engineering) शिक्षण पूर्ण केलंय. विपुल हुशार आणि मेहनती होता त्यामुळे त्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये चांगले मार्कही मिळाले. शेवटच्या सेमिस्टरनंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी लागण्याची मोठी संधी होती.

EP 10 : Bus, Evadach Swapna Aahe | नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा काय?
budget expectations
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 31, 2022 | 1:11 PM
Share

नाशिकच्या विपुल याने पुण्यातील (Pune) एका प्रख्यात संस्थेतून 2020 मध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगचं(Mechnicial Engineering) शिक्षण पूर्ण केलंय. विपुल हुशार आणि मेहनती होता त्यामुळे त्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये चांगले मार्कही मिळाले. शेवटच्या सेमिस्टरनंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी लागण्याची मोठी संधी होती. चार वर्षाच्या शिक्षणासाठी विपुलला जवळपास 12 लाख रुपयांचा खर्च आला. चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण होत असल्यानं मोठ्या पगाराची नोकरी लागण्याची शक्यता असल्यानं विपुलच्या वडिलांनी कर्ज काढून विपुलला शिकवलं. शिक्षण संपण्याआधीच काही कंपन्यांसोबत नोकरीसंदर्भात चर्चाही सुरू होती. मात्र, त्याचवेळी कोरोना(Covid 19) बॉम्ब फुटला. विपुलला ज्या कंपनीत नोकरी मिळण्याची संधी होती त्याच कंपनीत अनेक लोकांना कामांवरून कमी करण्यात आलं. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलेल्या विपुल आणि त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्नांचा कोरोनामुळे चुराडा झाला. काही दिवस नोकरी केल्यानंतर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं विपुलचं स्वप्न होतं. मात्र, सध्याच्या परिस्थितीत लहान नोकरीही लागण्याचीही शक्यताहा उरला नाही. दोन वर्षानंतर विपुलला एका स्टार्टअप कंपनीमध्ये काम मिळालं. मात्र,स्टार्टअप अपेक्षेप्रमाणं भरारी घेत नसल्यानं उद्योजकांनी अनेकवेळा बिजनेस मॉडेल बदललं . खासगी क्षेत्रात चांगली नोकरी मिळत नसल्यानं विपुलनं सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केलेत.

भारतात कोरोनामुळे अनेक लोकांना रोजगार गमवावा लागला. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक पदवीधारक तरुण नोकरीची संधी शोधत होते. अशातच कोरोनाकाळात अनेकजणांची नोकरी गेल्यानं बाजारात फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध झालं. त्यातुलनेत नोकरीच्या फार कमी संधी उपलब्ध आहेत. विपुलसारख्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणंही जवळपास दुरापास्तच झालं इतर देशांच्या तुलनेत भारतात पदवीधारकांना कमी पगार मिळतो. कोरोनाच्या अगोदर भारतात करार तत्वावर मोठ्या प्रमाणात नोकरी देण्याच्या प्रथा सुरू झाल्या. अशा नोकरीत पगार तुटपुंजा असतो आणि सामाजिक सुरक्षा नसते असं निरीक्षण विविध रोजगार सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली