AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salary Saving : पगार पुरत नाही, मग हा प्लॅन येईल उपयोगी, महिन्याच्या शेवटी दिवस मोजावे लागणार नाही. .

Salary Saving : पगाराचे नियोजन केल्यास..खर्चाची जास्त चिंता करावी लागणार नाही..

Salary Saving : पगार पुरत नाही, मग हा प्लॅन येईल उपयोगी, महिन्याच्या शेवटी दिवस मोजावे लागणार नाही. .
बचतीतून कमाईImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 01, 2022 | 7:01 PM
Share

नवी दिल्ली : ‘खुश है ज़माना आज पहली तारीख है’ अनेकांचा हा आनंद फार काळ काही टिकत नाही. अवघ्या आठवड्याभरानंतरच अनेकांना पुन्हा आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार खात्यात (Salary In Account) जमा होतो. पण तो टिकतो किती दिवस? खर्चाचा (Expenditure) ताळमेळ बसवता बसवता अर्धा महिना कधी निघून जातो, ते लक्षातच येत नाही. अशावेळी नियोजन केल्यास बचत(Saving) ही करता येते आणि वाढीव खर्चाही भागविता येतो.

आज खाऊन पिऊन सुखी असला तरी भविष्यातील मोठे खर्च तुमची वाट पाहत असतात. त्यामुळे भविष्यासाठी नियोजन करणे तुमच्या फायद्याचे ठरते. अनावश्यक खर्च कमी केले आणि बचतीची सवय लावली तर काही वर्षांनी मोठी रक्कम उभी राहते.

मुलांचे शिक्षण, आकस्मिक खर्च, वैद्यकीय खर्च, लग्नकार्य यासह इतर अनेक वेळा मोठ्या रक्कमेची आवश्यकता असते. तुम्ही वेळीच नियोजन केले नाही तर भविष्यातील हे मोठे खर्च तुम्ही कधीच पूर्ण करु शकणार नाहीत. त्यासाठी बचत हा चांगला पर्याय असतो.

पगार मिळताच, सर्वात अगोदर वेतनातील काही रक्कम दुसऱ्या बँकेतील खात्यात हस्तांतरीत करा. जर दुसरे बँक खाते नसेल तर पहिल्याच आठवड्यात यातील काही ठराविक रक्कम बचत योजनांमध्ये गुंतवा.

त्यासाठी SIP चा वापर करा. नियोजीत तारखी अगोदर पूर्वनिश्चित केल्यास आपोआप त्या दिवशी रक्कम संबंधित बचत योजनेत जमा होते. त्यासाठी तुम्हाला एकदाच खटाटोप करावा लागेल. नंतर पुढील महिन्यापासून तुम्हाला आपोआप अलर्ट मिळून रक्कम परस्पर वळती होईल.

जर तुम्हाला 40,000 रुपये वेतन असेल तर त्यातील 20 टक्के रक्कम म्हणजे जवळपास 8,000 रुपये दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करा. तुम्हाला वाटेल ही मोठी रक्कम आहे. पण यातून तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम मिळणार आहे, हे लक्षात ठेवा.

तुम्ही तुमचा अनावश्यक खर्च आटोक्यात आणा. व्यसन असतील तर ते बंद करा. नसेल तर जो अनावश्यक खर्च होतो, तो कुठे होतो, हे मागील महिन्यांतील खर्चावरुन तुमच्या लक्षात येईल, हा खर्च निम्म्यावर आणा. त्याची यादी तयार करा. एकदा खर्च नियंत्रणात आला की, बचत सोपी होईल.

तुम्ही क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर तर करत नाही ना? हे तपासा, ऑनलाईन खरेदीत तुमची किती रक्कम जाते. या खरेदीची खरंच आवश्यकता होती का, हे पहा. क्रेडिट कार्डवर खर्चाची लिमिट निश्चित करा. त्याआधारे कमीत कमी खर्च करा.

दरमहा म्युच्युअल फंडात SIP द्वारे एक निश्चित रक्कम गुंतवा. तुम्ही विविध फंड्समध्ये ही रक्कम गुंतवू शकता. त्यासाठी अर्थसल्लागाराचा सल्ला घ्या. तुम्हीही थोडा अभ्यास केला तर गुंतवणूक करु शकता. साधरणतः 10 ते 20 वर्षे सलग गुंतवणूक केल्यास तुम्हाला या दीर्घ गुंतवणुकीचे चांगला परतावा मिळेल.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.