AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशातील संकट भारतासाठी ठरले फायद्याचे, सहा महिन्यांत 60 हजार कोटींची रग्गड कमाई

india bangladesh relations: बांगलादेशात असलेले स्वस्त मजूर यामुळे त्या देशातील टेक्सटाइल उद्योग जगात सर्वात मोठा उद्योग होता. त्या ठिकाणी तयार झालेले कपडे भारतासह जगात अनेक ठिकणी निर्यात होत होते. परंतु बांगलादेशाला त्याच्या देशातील हिंसक आंदोलनाचा फटका बसला आहे.

बांगलादेशातील संकट भारतासाठी ठरले फायद्याचे, सहा महिन्यांत 60 हजार कोटींची रग्गड कमाई
india bangladesh relations
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 21, 2024 | 12:15 PM
Share

Bangladesh Textile Industry: बांगलादेशात गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिरता आहे. बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन केले. त्यानंतर त्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. बांगलादेशाची सूत्र नोबेल विजेता मोहम्मद युनूस यांच्याकडे गेली. परंतु देशातील हिंसाचार आणि अस्थिरता रोखण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे बांगलादेशातील उद्योग अन् व्यापार ठप्प झाला आहे. बांगलादेशातील संकट भारतासाठी फायदेशीर ठरले आहे. भारत जगात आपली छाप सोडत आहेत.

60 हजार कोटी रुपयांची भर

बांगलादेशात असलेले स्वस्त मजूर यामुळे त्या देशातील टेक्सटाइल उद्योग जगात सर्वात मोठा उद्योग होता. त्या ठिकाणी तयार झालेले कपडे भारतासह जगात अनेक ठिकणी निर्यात होत होते. परंतु बांगलादेशाला त्याच्या देशातील हिंसक आंदोलनाचा फटका बसला आहे. त्याचा फायदा भारताला मिळत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, बांगलादेश संकटानंतर भारतीय वस्त्रोद्योगाला गती मिळाली आहे. गेल्या 6 महिन्यांत त्यात 60 हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. बांगलादेशातील वाढत्या संकटामुळे जगभरातील कपडे खरेदीदार भारताकडे वळत आहेत, त्यामुळे भारताची आयात वाढली आहे.

कापड निर्यात 8.5 टक्क्यांनी वाढली

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जागतिक अनिश्चितता असूनही, चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एप्रिल-सप्टेंबर दरम्यान देशाची कापड निर्यात 8.5 टक्क्यांनी वाढून $7.5 अब्ज म्हणजेच 60 हजार कोटी रुपये झाली आहे. सप्टेंबरमध्येही तयार कपड्यांची निर्यात 17.3 टक्क्यांनी वाढून 1.11 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागील आकडेवारीनुसार बांगलादेशातून दर महिन्याला 3.5 ते 3.8 अब्ज डॉलर्सचे कपडे निर्यात केले जात होते. बांगलादेशातून युरोपियन युनियनमधून ब्रिटनमध्ये कपडे निर्यात केले जात होते.

बांगलादेशातील उद्योग भारतात येणार

बांगलादेशच्या संकटाचा थेट फायदा भारताला होत आहे. गेल्या 6 महिन्यांत भारतीय वस्त्रोद्योगाचा खूप फायदा झाला आहे. बांगलादेशातील अस्थिरतेमुळे जगभरातील व्यापारी भारतात आपल्या ऑर्डर्स वाढवत आहेत. तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीत भारत याचा फायदा घेऊन आपली निर्यात क्षमता वाढवू शकतो. त्याच वेळी, ज्या भारतीयांचे बांगलादेशमध्ये उत्पादन युनिट आहेत ते देखील त्यांचा व्यवसाय भारतात हलवू शकतात. यामुळे भारताचे उत्पन्न तर वाढेलच शिवाय देशात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!