AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Crisis: बांगलादेशाची चूक भारताच्या पथ्यावर, एकाच झटक्यात कसे शिफ्ट झाले मार्केट?

Bangladesh Crisis: बंगालादेशातील परिस्थितीमुळे गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला 4.6 अब्ज डॉलरचे कपडे निर्यात केले होते. म्हणजे अमेरिका भारतीय कपड्यांचा सर्वात मोठी खरेदीदार झाला आहे. बंगालादेशातील अस्थिरतेचा सर्वाधिक फायदा व्हिएतनामला झाला आहे.

Bangladesh Crisis: बांगलादेशाची चूक भारताच्या पथ्यावर, एकाच झटक्यात कसे शिफ्ट झाले मार्केट?
बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताला फायदा
| Updated on: Oct 28, 2024 | 10:25 AM
Share

Bangladesh Crisis: बांगलादेशात सुरु असलेल्या राजकीय अस्थिर परिस्थितीचा फायदा भारताला होत आहे. अमेरिका आता कपडे खरेदीसाठी भारताकडे वळला आहे. भारतातील राजकीय स्थिरता आणि वितरण प्रणाली सुरळीत आहे. यामुळे अमेरिकेतील खरेदीदार भारताला विश्वासार्ह मानत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या कपड्यांपैकी एक तृतीयांश कपडे अमेरिकेत जातात. अमेरिकेला कपडे पुरवणारा भारत जगातील चौथा मोठा देश आहे. त्यातच आता बांगलादेशातील परिस्थितीमुळे जागतिक स्तरावरील कंपन्यांचे लक्ष भारताकडे वळले आहे. भारतातून कपडे मागवणे अमेरिकन कंपन्यांना सोयीचे वाटते. भारतातून बहुतेक सुती कपडे अमेरिकेत जातात.

भारतातील निर्यातीचा वाटा वाढला

अमेरिकन अंतरराष्ट्रीय व्यापार आयोगने (ITC) नुकताच एक अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की, भारत, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि कंबोडिया या देशांनी गेल्या काही वर्षांत अमेरिकेत सर्वाधिक कपड्यांची निर्यात केली होती. या सर्व देशांनी चीनला मागे टाकले होते. 2013 मध्ये अमेरिकेने आयात केलेल्या सर्व कपड्यांपैकी 37.7% कपडे चीनमधून आले होते. पण, 2023 मध्ये हा आकडा घसरला असून 21.3% वर आला आहे. या काळात भारतातून अमेरिकेत निर्यात होण्याचा वाटा 4% वरून 5.8% पर्यंत आला आहे.

बंगालादेशातील परिस्थितीमुळे गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला 4.6 अब्ज डॉलरचे कपडे निर्यात केले होते. म्हणजे अमेरिका भारतीय कपड्यांचा सर्वात मोठी खरेदीदार झाला आहे. बंगालादेशातील अस्थिरतेचा सर्वाधिक फायदा व्हिएतनामला झाला आहे. व्हिएतनामने गेल्या दशकात आपला हिस्सा 10% वरून 17.8% पर्यंत वाढवला आहे.

यामुळेही भारतावर विश्वास

बांगलादेश किंवा इतर आशिया देशांपेक्षा अमेरिकन कंपन्या भारतातून कपडे घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्याला मुख्य कारण भारतातील राजकीय स्थिरता आहे. भारतात कॉटनचे कपडे उच्च दर्जाचे आहेत. भारतात त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारतातच धागा बनवण्यापासून ते कापड बनवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया होते. यामुळे अमेरिकन कंपन्या भारताला विश्वासार्ह पुरवठादार मानतात. बांगलादेशातील परिस्थितीमुळे भारतीय बाजारपेठ विश्वसार्ह बाजारपेठ ठरली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.