AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2026: यंदाच्या बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळणार? जाणून घ्या

Budget 2026: कृषी अर्थसंकल्प 2025-2026 मधील 1.37 लाख कोटी रुपयांवरून सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा आहे, यात शेतकऱ्यांना काय मिळेल, हे जाणून घेऊया.

Budget 2026: यंदाच्या बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळणार? जाणून घ्या
farmersImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 21, 2026 | 4:02 PM
Share

Budget 2026: यंदाचा अर्थसंकल्प नेमका कसा असेल, सर्वसामान्यांना काय मिळणार, पगारदार, मध्यमवर्गीयांच्या आशा काय आहेत, याची सध्या चर्चा आहे. यातच शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार, असा प्रश्न ग्रामीण भागात विचारला जातोय, याविषयीची माहिती पुढे जाणून घ्या. यावेळी पहिल्यांदाच रविवारी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहोत. यावेळी शेतकऱ्यांना अर्थमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, अर्थसंकल्प 2026 ही दीर्घकालीन बळकटीसाठी कृषी क्षेत्रात विशेष उपक्रम घेण्याची संधी आहे. 2013-14 या वर्षात 21,933 कोटी रुपयांवरून आता 1.27 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत.

संशोधन विश्लेषक यांच्या मते, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये हवामान बदल, इनपुट खर्च आणि बाजारपेठेतील प्रवेश यासारख्या आव्हानांच्या पाश्वभूमीवर कृषी क्षेत्राला प्राधान्य मिळण्याची अपेक्षा आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे 18-20 टक्के आहे, सरकारला लक्ष्यित वाटप आणि सुधारणांद्वारे उत्पादकता, स्थिरता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे.

कृषी बजेट 1.5 लाख कोटी रुपये असू शकते

कृषी अर्थसंकल्प 2025-26 मधील 1.37 लाख कोटी रुपयांवरुन सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये पीएम-किसान, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत सिंचन योजनांसाठी अधिक निधीचा समावेश असू शकतो.

कवच 4.0

तज्ज्ञांचा विश्वास आहे की, या अर्थसंकल्पात कवच 4.0 ही प्रगत स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली सुरू होण्याची अपेक्षा आहे, तसेच उर्वरित मार्गाच्या विद्युतीकरणावर काम केले जाईल, 2030 पर्यंत मालवाहतुकीतील रेल्वेचा वाटा 26 टक्के वरून 45 टक्के पर्यंत वाढवण्याच्या दिशेने देखील हे क्षेत्र वाटचाल करत आहे.

नवीन बियाणे विधेयक

कृषिमंत्र्यांच्या घोषणेनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बियाणे विधेयक सादर करण्याचा सरकारचा मानस आहे. या कायद्यान्वये बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांच्या विक्रीला आळा बसेल आणि 30 लाख रुपयांपर्यंत दंड आणि जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल.

बियाणांची गुणवत्ता सुनिश्चित करणे, नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचविणे आणि एकूणच कृषी उत्पादकता वाढवणे हे याचे उद्दिष्ट आहे. अभिनव तिवारी यांच्या मते, बियाणे आणि खत कंपन्यांना या बिलाचा फायदा होऊ शकतो.

कृषी आणि अन्नधान्य निर्यात

भारताची कृषी आणि अन्नधान्य निर्यात दरवर्षी सुमारे 50-55 अब्ज डॉलर्स इतकी आहे, परंतु जागतिक व्यापारातील अडथळे आणि शुल्क अडथळे हे अल्पकालीन आव्हान म्हणून उदयास आले आहे.

अर्थसंकल्प 2026 मध्ये निर्यात सुविधा, जलद मंजुरी आणि मूल्यवर्धित कृषी उत्पादनांना पाठिंबा यावर लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे दरांचा दबाव असूनही शेतकरी आणि कृषी कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत अधिक प्रकारे प्रवेश मिळू शकेल.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.