AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त आहे देशाच्या ‘या’ तीन कंपन्यांची संपत्ती!

भारतातील अशा तीन कंपन्या ज्यांची मार्केट कॅप 32 लाख कोटींपेक्षा जास्त आहे, तर केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये या कंपन्यांचा खर्चच 30.42 लाख कोटी रुपये इतका होता.

केंद्र सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त आहे देशाच्या 'या' तीन कंपन्यांची संपत्ती!
| Edited By: | Updated on: Jan 18, 2021 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात बड्या तीन कंपन्यांची संपत्ती केंद्र सरकारच्या बजेटपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील अशा तीन कंपन्या ज्यांची मार्केट कॅप 32 लाख कोटींपेक्षा जास्त आहे, तर केंद्र सरकारच्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये या कंपन्यांचा खर्चच 30.42 लाख कोटी रुपये इतका होता. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) या तीन कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या भांडवलाच्या बाबतीत पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत. (business news 3 companies market cap is more than budget of the central government)

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या बजेटपेक्षाही जास्त रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 12.28 लाख कोटी रुपये इतकी आहे. तर टीसीएसचे बाजार भांडवल 12.13 लाख कोटी रुपये आहे आणि एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 8.07 लाख कोटी रुपये आहे. आता तुम्ही या तिन्ही रक्कमेला एकत्र केलं तर ही रक्कम भारत सरकारच्या बजेटपेक्षा 32 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

टाटा समूहाचे मार्केट कॅप 17 लाख कोटी

टाटा कंपनीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मार्केटमध्ये भारतातील आघाडीचा कॉर्पोरेट ग्रुप टाटा पहिल्या क्रमांकावर आहे, तर एचडीएफसी आणि रिलायन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा कंपनी समूहाची मार्केट कॅप सुमारे 17 लाख कोटी रुपये आहे तर एचडीएफसी समूहाची बाजारपेठ सुमारे 15 लाख कोटी रुपये आहे.

एका वर्षात 42 टक्क्यांनी घेतली उडी

केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूहाचं काम गेल्या वर्षापासून खूपच चांगलं सुरु आहे. यामुळे मार्केटमध्येही त्यांची मागणी वाढली असून मागील एका वर्षात सुमारे 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अजय केडिया यांच्या माहितीनुसार, टाटा समूहाच्या 28 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 18 कंपन्या गेल्या महिन्यात खूपच दमदार राहिल्या. 2021 मध्ये टाटाच्या समभागांच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (business news 3 companies market cap is more than budget of the central government)

संबंधित बातम्या – 

अद्याप नाही आला इनकम टॅक्स रिफंड? पैसे खात्यात मिळवण्याची ‘ही’ आहे पद्धत

SBI बँकेची अनोखी सुविधा, पैसे भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, बँक कर्मचारी घरी येणार

(business news 3 companies market cap is more than budget of the central government)

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?