AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar on Ajit Pawar Death : अजितदादांचा घातपात? पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही शंका? रोहित पवार यांनी काय म्हटलं?

अजित पवार यांच्या अपघाती निधनावर रोहित पवारांनी घातपाताची शंका उपस्थित केली आहे. पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही अपघाताविषयी प्रश्नचिन्ह असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. या प्रकरणी अमित शहांना भेटून चौकशीची मागणी करणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. अपघातामागचे सत्य समोर यावे, अशी कुटुंबीयांची भूमिका आहे.

Rohit Pawar on Ajit Pawar Death : अजितदादांचा घातपात? पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही शंका? रोहित पवार यांनी काय म्हटलं?
अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही शंका ?
| Updated on: Feb 11, 2026 | 2:32 PM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर बऱ्याच शंका व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांच्या पक्षातूनही या शंका व्यक्त केल्या जात असून आता अजितदादांच्या कुटुंबीयांकडूनही या शंका व्यक्त गेल्या आहेत. अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही या अपघातावर शंका व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अजितदादांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली. आजही रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हीच शंका बोलून दाखवली आहे. तसेच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही तेच असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सादरीकरण करत अजित पवार यांच्या अपघातावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पार्थला मी भेटलो. त्याच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळेच अमोल मिटकरी, रुपाली पाटील वगैरे राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्या सांगण्यावरूनच ते भेटले असावे. पार्थ आणि जयच्या मनात अपघाताविषयी शंका आहे. शंका नसती तर त्यांच्या पक्षाचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले नसते. अपघात का झाला? कसा झाला? याची माहिती आम्हाला हवी आहे. त्यासाठी आम्ही हे करत आहोत, असं रोहित पवार म्हणाले.

अमित शाह यांना भेटणार

सुप्रिया सुळे यांनी आज अमित शाह यांची भेटीची वेळ मागितली आहे. माझ्या वतीने त्यांनी ही वेळ मागितली आहे. आमचा कोणत्याही पक्ष किंवा सरकारवर आरोप नाही. पण या घटनेची चौकशी झाली पाहिजे. अमित शाह यांना भेटून आम्ही त्यांना तशी मागणी करणार आहोत. यात घातपात आहे, असं आमचं म्हणणं आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय.

त्या दिशेने तपास व्हावा

थायलंडमध्ये एका पायलटने जाणूनबूजून विमान पाडलं होतं. का पाडलं होतं? त्याची चौकशी झाली. त्या अपघाताची माहिती समोर आली. ही माहिती कशी बाहेर आली? त्या चौकशी एजन्सी कोणत्या होत्या? हे पाहून, त्याची माहिती घेऊन त्या दिशेनेही तपास केला पाहिजे, असंही रोहित पवार म्हणाले.

काही प्रश्न…

यावेळी रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मेन पायलट कपूरची चौकशी झाली पाहिजे. ते दारू का पित होते? त्यांना मेंटल ट्रेस होता का? फायनान्शियल कारण होतं का? पैशासाठी त्यांच्यावर दबाव होता का? त्यामुळे त्यांनी अपघात केला का? याची चौकशी झाली पाहिजे. कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. चॅट डीलिट झाल्या तरी ती माहिती मिळते. अॅरो नावाच्या कंपनीच्या चॅटचीही चौकशी केली पाहिजे. हँडलरने ओके का म्हटलं? व्हिजीबिलीटी नसताना टेक ऑफ का झालं आणि लँड का झालं याचीही चौकशी झाली पाहिजे. आम्हाला कोर्टात जायचं नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या एजन्सी चांगली चौकशी करतील. बाहेरच्या एजन्सीलाही चौकशीत घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.