AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिझेल ट्रॅक्टरचे रूपांतर थेट सीएनजीमध्ये, नितीन गडकरींची भन्नाट कल्पना

“मी स्वतः माझे ट्रॅक्टर सीएनजीवर चालणाऱ्या वाहनात रूपांतरित केलेत. कच्चे तेल आणि इंधन गॅसच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी आपण सोयाबीन, गहू, धान, कापूस इत्यादी पिकांच्या शेतातील कचऱ्यापासून बायो-सीएनजी आणि बायो-एलएनजी यांसारख्या जैव इंधनांच्या उत्पादनास प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अतिरिक्त उत्पन्नही मिळेल. 'आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोलियम इंधनाचे दर देशात विक्रमी पातळीवर पोहोचलेत, त्या महागाईचा भार सामान्य माणसावर पडल्याचंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय.

डिझेल ट्रॅक्टरचे रूपांतर थेट सीएनजीमध्ये, नितीन गडकरींची भन्नाट कल्पना
nitin gadkari
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 8:56 PM
Share

नवी दिल्लीः कच्चे तेल आणि इंधन गॅसच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशातील जैव इंधनांच्या उत्पादनाला गती देण्यावर भर देत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले. तसेच त्यांनी स्वतः ट्रॅक्टरचे सीएनजी वाहनात रूपांतर करण्यासाठी पुढाकार घेतलाय. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) तर्फे इंदूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सोयाबीन परिषदेला गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलंय.

जैव इंधनाचे उत्पादन वाढवण्यावर भर

“मी स्वतः माझे ट्रॅक्टर सीएनजीवर चालणाऱ्या वाहनात रूपांतरित केलेत. कच्चे तेल आणि इंधन गॅसच्या आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी आपण सोयाबीन, गहू, धान, कापूस इत्यादी पिकांच्या शेतातील कचऱ्यापासून बायो-सीएनजी आणि बायो-एलएनजी यांसारख्या जैव इंधनांच्या उत्पादनास प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अतिरिक्त उत्पन्नही मिळेल. ‘आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोलियम इंधनाचे दर देशात विक्रमी पातळीवर पोहोचलेत, त्या महागाईचा भार सामान्य माणसावर पडल्याचंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय.

भारतात 65 टक्के खाद्यतेल आयात

गडकरींनी असेही सांगितले की, सध्या भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेच्या 65 टक्के आयात करतो आणि या आयातीवर देशाला दरवर्षी एक लाख 40 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. या आयातीमुळे एकीकडे देशाच्या ग्राहक बाजारात खाद्यतेलांचे भाव जास्त आहेत, तर दुसरीकडे तेलबिया पिकणाऱ्या घरगुती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळत नाही, असे ते म्हणाले.

खाद्यतेलाच्या उत्पादनात स्वावलंबी असणे आवश्यक

खाद्यतेल उत्पादनात भारताचे स्वावलंबनाचे ध्येय साध्य करण्यासाठी देशाने सोयाबीनचे विद्यमान बियाणे म्हणून मोहरी जीन वर्धित (जीएम) बियाण्यांच्या धर्तीवर जीएम सोयाबीन बियाण्याच्या विकासाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, यावर गडकरी यांनी भर दिला. ते म्हणाले, “मी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे आणि मला माहीत आहे की, देशातील अनेक लोक अन्न पिकांच्या जीएम बियाण्यांना विरोध करतात. परंतु जीएम सोयाबीनमधून काढलेल्या इतर देशांमधून सोयाबीन तेलाची आयात आम्ही थांबवू शकत नाही.

कुपोषणामुळे हजारो लोक मृत्युमुखी

विशेषतः आदिवासी भागात कुपोषणावर मात करण्यासाठी सोया ऑईल केकपासून अन्नपदार्थ बनवण्याबाबत सविस्तर संशोधनाची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. “आपल्या देशातील अनेक भागात प्रथिनांच्या कमतरतेमुळे आदिवासी समाजातील हजारो लोक कुपोषणामुळे मरत आहेत. सोया केकमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. ‘एक सामान्य विकास कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करा.

संबंधित बातम्या

ऑक्टोबरमध्ये ‘या’ राज्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार, डीए आणि टीएमध्ये इतकी वाढ

मुकेश अंबानींनी सौर ऊर्जेमध्ये क्रांती आणण्यासाठी ही कंपनी केली खरेदी, हजारो कोटी रुपयांचा करार

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.